पावसामुळे सोयाबीन पीक पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:05+5:302021-07-26T04:20:05+5:30

कासार बालकुंदा परिसरात यंदा वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे विलंबाने पेरण्या झाल्या. त्यानंतर सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतातील सोयाबीनच्या ...

Soybean crop in water due to rains | पावसामुळे सोयाबीन पीक पाण्यात

पावसामुळे सोयाबीन पीक पाण्यात

कासार बालकुंदा परिसरात यंदा वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे विलंबाने पेरण्या झाल्या. त्यानंतर सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतातील सोयाबीनच्या पिकात पाणी साचले आहे. परिणामी, काही ठिकाणचे पीक पिवळे पडत आहे तर काही ठिकाणचे जागेवरच कुजत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. गेल्या वर्षी पीकविमा भरूनही शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

...

गुडघाभर पाण्यातून काढावी लागतेय वाट

कासार बालकुंदा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या निलंगा तालुक्यातील कासारशिरशी- बसवकल्याण या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. परिणामी, कसरत होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

सीमावर्ती भागातील देवी हल्लाळी, मिरगाळी, तांबाळा, तांबळावाडी, कासार बालकुंदा या गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ममदापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमाेर खड्डा पडला आहे. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी, हा रस्ता बंद झाला आहे. शिक्षकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

छोटी वाहने या पाण्यातून जाताना अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Soybean crop in water due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.