शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरापासून पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

जळकोट : आठवडाभरापासून पाऊस नसल्याने जळकोट तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उर्वरित ...

जळकोट : आठवडाभरापासून पाऊस नसल्याने जळकोट तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उर्वरित ५० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत १३९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. बळिराजाचे डोळे वरुणराजाकडे लागले आहेत.

जळकोट तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. नगदी पीक म्हणून सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. त्यापाठोपाठ कापसाची लागवड केली जाते. तालुक्यात १० जून रोजी १५ मि.मी. पाऊस झाला होता. ११ जून रोजी ४० मि.मी. पाऊस झाला. १४ रोजी २९ मि.मी., तर १६ जून रोजी ४९ मि.मी. पाऊस झाला.

जळकोट महसूल मंडळात १९२ मि.मी., घोणसी मंडळात ९६ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. या पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या होत असल्याने समाधान व्यक्त होत होते. दरम्यान, १६ जूनपासून पावसाने डोळे वटारल्याने तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो. त्यापाठोपाठ कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके घेतली जातात. गेल्या आठवडाभरापासून पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज...

मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांचे चांगले पीक उगवले आहे. सध्या पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी विहीर, बोअरच्या आधारे पाणी देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

१० हजार हेक्टरवर सोयाबीन...

तालुक्यात आतापर्यंत जवळपास १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ तूर, उडिदाचा अल्प प्रमाणात पेरा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पाऊस झाल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. आगामी काळात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.

दुबार पेरणीचे संकट...

तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाग मोलाचे बी- बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. पेरणीवेळी खताचा वापर केला. परंतु, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.