शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ

By हणमंत गायकवाड | Updated: June 1, 2024 16:38 IST

थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात सर्वच रक्तगटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदाते मिळत नाहीत. शिवाय उन्हाळा असल्यामुळे काही दिवसांपासून रक्तदान शिबिरही होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, रुग्ण नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डोनर हिस्ट्री पाहून रुग्ण नातेवाइकांच्या मागणीनुसार ब्लड बँका रक्त मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे दीडशे ते दोनशे रुग्ण आहेत. या रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज लागते. त्यांच्यासाठीही सध्या उणीव भासत आहे.

लातूर शहरामध्ये जवळपास सात ते आठ रक्तपेढ्या आहेत. त्यात सिव्हिल रक्तपेढी, भालचंद्र रक्तपेढी, सरस्वती रक्तपेढी, माउली ब्लड बँक, संजीवनी ब्लड बँक, लातूर ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. या ब्लड बँकांशी संपर्क साधला असता जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.

का आहे रक्ताचा तुटवडा?सध्या उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत, अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही, त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. उन्हाळा असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे कॅम्पही होत नाहीत.

डोनरला शोधून आणावे लागते.....सध्या लातूरच्या तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांवर आहे. त्यामुळे ऊन लागून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. अशावेळी ब्लड बँकेकडून डोनरचा शोध घेतला जातो आणि संबंधित रुग्ण नातेवाइकांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढी टंचाई सध्या रक्तगटाची आहे. उन्हाची तीव्रता कमी झाल्याशिवाय तुटवडा कमी होणार नाही, असे चित्र सध्या दिसते.

लवकरच टंचाई दूर होऊ शकतेलातूर शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. खूपच टंचाई आहे. दरवर्षी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये रक्ताची टंचाई असते. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे टंचाईचे प्रमाण अधिक आहे. पुढील पंधरा दिवसांत ही टंचाई कमी होईल. लवकरच टंचाई दूर होऊ शकते.- विकास करंजे, सरस्वती रक्तपेढी, लातूर

टॅग्स :laturलातूरBlood Bankरक्तपेढी