शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ

By हणमंत गायकवाड | Updated: June 1, 2024 16:38 IST

थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात सर्वच रक्तगटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदाते मिळत नाहीत. शिवाय उन्हाळा असल्यामुळे काही दिवसांपासून रक्तदान शिबिरही होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, रुग्ण नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डोनर हिस्ट्री पाहून रुग्ण नातेवाइकांच्या मागणीनुसार ब्लड बँका रक्त मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे दीडशे ते दोनशे रुग्ण आहेत. या रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज लागते. त्यांच्यासाठीही सध्या उणीव भासत आहे.

लातूर शहरामध्ये जवळपास सात ते आठ रक्तपेढ्या आहेत. त्यात सिव्हिल रक्तपेढी, भालचंद्र रक्तपेढी, सरस्वती रक्तपेढी, माउली ब्लड बँक, संजीवनी ब्लड बँक, लातूर ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. या ब्लड बँकांशी संपर्क साधला असता जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.

का आहे रक्ताचा तुटवडा?सध्या उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत, अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही, त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. उन्हाळा असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे कॅम्पही होत नाहीत.

डोनरला शोधून आणावे लागते.....सध्या लातूरच्या तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांवर आहे. त्यामुळे ऊन लागून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. अशावेळी ब्लड बँकेकडून डोनरचा शोध घेतला जातो आणि संबंधित रुग्ण नातेवाइकांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढी टंचाई सध्या रक्तगटाची आहे. उन्हाची तीव्रता कमी झाल्याशिवाय तुटवडा कमी होणार नाही, असे चित्र सध्या दिसते.

लवकरच टंचाई दूर होऊ शकतेलातूर शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. खूपच टंचाई आहे. दरवर्षी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये रक्ताची टंचाई असते. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे टंचाईचे प्रमाण अधिक आहे. पुढील पंधरा दिवसांत ही टंचाई कमी होईल. लवकरच टंचाई दूर होऊ शकते.- विकास करंजे, सरस्वती रक्तपेढी, लातूर

टॅग्स :laturलातूरBlood Bankरक्तपेढी