शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ

By हणमंत गायकवाड | Updated: June 1, 2024 16:38 IST

थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात सर्वच रक्तगटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदाते मिळत नाहीत. शिवाय उन्हाळा असल्यामुळे काही दिवसांपासून रक्तदान शिबिरही होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, रुग्ण नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डोनर हिस्ट्री पाहून रुग्ण नातेवाइकांच्या मागणीनुसार ब्लड बँका रक्त मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे दीडशे ते दोनशे रुग्ण आहेत. या रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज लागते. त्यांच्यासाठीही सध्या उणीव भासत आहे.

लातूर शहरामध्ये जवळपास सात ते आठ रक्तपेढ्या आहेत. त्यात सिव्हिल रक्तपेढी, भालचंद्र रक्तपेढी, सरस्वती रक्तपेढी, माउली ब्लड बँक, संजीवनी ब्लड बँक, लातूर ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. या ब्लड बँकांशी संपर्क साधला असता जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.

का आहे रक्ताचा तुटवडा?सध्या उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत, अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही, त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. उन्हाळा असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे कॅम्पही होत नाहीत.

डोनरला शोधून आणावे लागते.....सध्या लातूरच्या तापमानाचा पारा ४० ते ४४ अंशांवर आहे. त्यामुळे ऊन लागून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. अशावेळी ब्लड बँकेकडून डोनरचा शोध घेतला जातो आणि संबंधित रुग्ण नातेवाइकांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढी टंचाई सध्या रक्तगटाची आहे. उन्हाची तीव्रता कमी झाल्याशिवाय तुटवडा कमी होणार नाही, असे चित्र सध्या दिसते.

लवकरच टंचाई दूर होऊ शकतेलातूर शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. खूपच टंचाई आहे. दरवर्षी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये रक्ताची टंचाई असते. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे टंचाईचे प्रमाण अधिक आहे. पुढील पंधरा दिवसांत ही टंचाई कमी होईल. लवकरच टंचाई दूर होऊ शकते.- विकास करंजे, सरस्वती रक्तपेढी, लातूर

टॅग्स :laturलातूरBlood Bankरक्तपेढी