शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:43 IST

जळकोटच्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील घटना; भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघा मुलांचा बुडून अंत

जळकोट (जि. लातूर) : विवाह समारंभासाठी आलेली तीन मुले पोहण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात उतरली होती. तेव्हा लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून मोठ्या भावाने व अन्य एकाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास लाळी खु. (ता. जळकोट) येथे घडली आहे.

एकनाथ हनुमंत तेलंगे (१५, रा. राजा दापका, जि. नांदेड), संगमेश्वर बंडू तेलंगे (१३) व श्याम उर्फ चिमा बंडू तेलंगे (१५, दोघेही रा. चिमेगाव, ता. कमलनगर) असे मयत तिघा मुलांची नावे आहेत. जळकोट तालुक्यातील लाळी खु. येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी होता. त्यासाठी चिमेगाव येथील बंडू तेलंगे व राजा दापका येथील हनुमंत तेलंगे यांचे कुटुंबिय आले होते. शुक्रवारी सकाळी गावातील विष्णूकांत तेलंगे (१८) व एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे व त्याचा सख्खा भाऊ श्याम उर्फ चिमा तेलंगे हे चौघे गावानजीकच्या तिरु नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते.

संगमेश्वर यास पोहता येत नव्हते. तरीही तो पाण्यात उतरला आणि पोहण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, तो बुडू लागल्याचे पाहून भाऊ श्याम व एकनाथ यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, संगमेश्वरने त्या दोघांच्या गळ्यास मिठी मारल्यामुळे तिघेही बुडू लागले. तिघेही काही वेळात पाण्याबाहेर येतील म्हणून सोबतचा विष्णूकांत हा त्यांची प्रतीक्षा करीत होता. मात्र, ते तिघेही बुडाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे घाबरुन त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, जवळ कोणीही नसल्याने त्याने गावाकडे धाव घेऊन कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना माहिती दिली.गावकऱ्यांनी तात्काळ बंधाऱ्याकडे धाव घेऊन पाण्यात उडी घेऊन मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. दरम्यान, काही जणांनी पोलीस प्रशासनास ही माहिती दिली. त्यावरुन तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व पोलीस निरीक्षक निशा पठाण यांनी उदगीरच्या अग्नीशमन दलास पाचारण केले.

दीड तास मुलांचा शोध...गावातील महेश पाटील, संगमेश्वर देवशेट्टी, माधव मिरजगावे, हावगीस्वामी शिवम पाटील यांनी बंधाऱ्यात उतरुन मुलांचा शोध घेतला. पण मुले सापडली नाहीत. त्यामुळे अग्नीशमन दलातील विशाल गंडारे, रत्नदीप पारखे, अरबाज शेख, शिवा राडगे, माधव गोंड यांनी पाण्यात उडी घेऊन तब्बल दीड तास मुलांचा शोध घेतला. त्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

आई- वडिलांनी फोडला टाहो...बंडू तेलंगे हे आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या दुर्देवी घटनेत दोन्ही मुलांचा करुण अंत झाला. तसेच हनुमंत तेलंगे यांना एकुलता एक मुलगा होता. तोही मयत झाल्याने दोन्ही कुटुंबियांतील आई- वडिलांनी टाहो फोडला होता. त्यामुळे विवाह समारंभस्थळी शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर