शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:43 IST

जळकोटच्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील घटना; भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघा मुलांचा बुडून अंत

जळकोट (जि. लातूर) : विवाह समारंभासाठी आलेली तीन मुले पोहण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात उतरली होती. तेव्हा लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून मोठ्या भावाने व अन्य एकाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास लाळी खु. (ता. जळकोट) येथे घडली आहे.

एकनाथ हनुमंत तेलंगे (१५, रा. राजा दापका, जि. नांदेड), संगमेश्वर बंडू तेलंगे (१३) व श्याम उर्फ चिमा बंडू तेलंगे (१५, दोघेही रा. चिमेगाव, ता. कमलनगर) असे मयत तिघा मुलांची नावे आहेत. जळकोट तालुक्यातील लाळी खु. येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी होता. त्यासाठी चिमेगाव येथील बंडू तेलंगे व राजा दापका येथील हनुमंत तेलंगे यांचे कुटुंबिय आले होते. शुक्रवारी सकाळी गावातील विष्णूकांत तेलंगे (१८) व एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे व त्याचा सख्खा भाऊ श्याम उर्फ चिमा तेलंगे हे चौघे गावानजीकच्या तिरु नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते.

संगमेश्वर यास पोहता येत नव्हते. तरीही तो पाण्यात उतरला आणि पोहण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, तो बुडू लागल्याचे पाहून भाऊ श्याम व एकनाथ यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, संगमेश्वरने त्या दोघांच्या गळ्यास मिठी मारल्यामुळे तिघेही बुडू लागले. तिघेही काही वेळात पाण्याबाहेर येतील म्हणून सोबतचा विष्णूकांत हा त्यांची प्रतीक्षा करीत होता. मात्र, ते तिघेही बुडाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे घाबरुन त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, जवळ कोणीही नसल्याने त्याने गावाकडे धाव घेऊन कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना माहिती दिली.गावकऱ्यांनी तात्काळ बंधाऱ्याकडे धाव घेऊन पाण्यात उडी घेऊन मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. दरम्यान, काही जणांनी पोलीस प्रशासनास ही माहिती दिली. त्यावरुन तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व पोलीस निरीक्षक निशा पठाण यांनी उदगीरच्या अग्नीशमन दलास पाचारण केले.

दीड तास मुलांचा शोध...गावातील महेश पाटील, संगमेश्वर देवशेट्टी, माधव मिरजगावे, हावगीस्वामी शिवम पाटील यांनी बंधाऱ्यात उतरुन मुलांचा शोध घेतला. पण मुले सापडली नाहीत. त्यामुळे अग्नीशमन दलातील विशाल गंडारे, रत्नदीप पारखे, अरबाज शेख, शिवा राडगे, माधव गोंड यांनी पाण्यात उडी घेऊन तब्बल दीड तास मुलांचा शोध घेतला. त्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

आई- वडिलांनी फोडला टाहो...बंडू तेलंगे हे आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या दुर्देवी घटनेत दोन्ही मुलांचा करुण अंत झाला. तसेच हनुमंत तेलंगे यांना एकुलता एक मुलगा होता. तोही मयत झाल्याने दोन्ही कुटुंबियांतील आई- वडिलांनी टाहो फोडला होता. त्यामुळे विवाह समारंभस्थळी शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर