शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

मानधन थकल्याने वृद्ध कलावंतांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

लातूर : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन नोव्हेंबरपासून थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ८०० ...

लातूर : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन नोव्हेंबरपासून थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ८०० वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. मानधनासाठी या कलावंतांचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सातत्याने चौकशीसाठी हेलपाटे होत आहेत.

साहित्य व कला क्षेत्रासाठी ज्यांनी १५ ते २० वर्षे महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, ज्या कलावंत, साहित्यिकांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मानधन योजना राबविण्यात येते. या योजनेत तीन स्तर करण्यात आले असून, राष्ट्रीय पातळीवरील कलावंत, साहित्यिकास २ हजार १००, राज्य पातळीवरील कलावंतास १ हजार ८००, तर जिल्हा पातळीवरील वृद्ध साहित्य, कलावंतास मासिक दीड हजार रुपये मानधन देण्यात येते.

शासनाच्या या योजनेमुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाहासाठी काही प्रमाणात मदत होत आहे. जर साहित्यिक, कलावंताचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस तहहयात असेपर्यंत मानधन देण्यात येते. या मानधनाची रक्कम मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून थेट कलावंतांच्या खात्यावर जमा करण्यात येते. मात्र, नोव्हेंबरपासून अद्यापही या कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा झाले नाही.

कोरोनाच्या संकटामुळे वृद्ध साहित्यिक, कलावंतांना घराबाहेर पडणे अशक्य ठरत आहे, तर राज्य शासनाकडून मानधन देण्यात आले नसल्याने काही कलावंतांसमोर उदरनिर्वाहासह विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे कलावंत सातत्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे चौकशी करीत आहेत. मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट होत आहे.

जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा...

पूर्वी जिल्हा परिषदेमार्फत कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येत होते. मात्र, आता थेट मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून मानधन जमा करण्यात येत आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्या कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येत आहेत. तसेच आमचाही पाठपुरावा सुरू आहे.

- सुनील खमितकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी.

पैसे नसल्याने लाभार्थ्यांची अडचण...

कोरोनाच्या संकटापासून नियमितरीत्या खात्यावर मानधन जमा होत नाही. आतातर नोव्हेंबरपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे आजारपण आल्यानंतर दवाखान्यात उपचार घ्यावे म्हटले तर पैसे नसल्याने उपचारही घेता येत नाहीत. काही वेळेस उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे एका वृद्ध साहित्यिक, कलावंताने सांगितले.