शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंड लॉकडाऊनमुळे शहरात सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजारांच्या पुढे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्येत ...

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजारांच्या पुढे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद दिला. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलीस दिसत होते. शिवाजी चौक, गंजगोलाई, गांधी चौक, गूळ मार्केट, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोडवर नेहमी वर्दळ असते. मात्र, शनिवारी लॉकडाऊन असल्याने चिटपाखरूही रस्त्यावर नव्हते. सगळे शहर सामसूम होते. लातूर शहराप्रमाणे ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणीही कडकडीत बंद पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या वतीने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सतर्क होती. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांना अडवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या नागरिकांना बसवून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने कडेकोट बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.

एसटीचे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले...

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा या पाचही आगारांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद होत्या. या पाचही आगारांच्या ३०० बस प्रवाशाच्या दिमतीला असायच्या; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या बंद होत्या. ६०० फेऱ्यांपैकी जिल्हाअंतर्गत प्रती आगार ८ ते १० फेऱ्या झाल्या. त्यामुळे एस.टी.चे १८ लाखांचे नुकसान पहिल्या दिवशी शनिवारी झाले.

लॉकडाऊनपूर्वी एस.टी.ला. जिल्ह्यातील पाचही आगारांना मिळून दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १८ लाखांवर उत्पन्न आले होते. मात्र, त्यातही कडक निर्बंध सुरू झाल्याने घट झाली होती. शनिवारी त्यात पुन्हा आणखी घट झाली असून, प्रवासी नसल्यामुळे एस.टी.ला. १८ लाखांचा तोटा शनिवारी सहन करावा लागला.

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना अडवून पोलीस ठाण्यामध्ये आणले. नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये काही काळ बसवून त्यांच्याकडून दंड वसूल केला. जवळपास १७ हजार रुपयांचा दंड आकारून सोडून देण्यात आले.