शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा!

By संदीप शिंदे | Updated: August 28, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती.

रेणापूर ( लातूर) : तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची चांगली हजेरी आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ६४.३१ टक्के भरला असून, शेतकऱ्यांची व नागरिकांची चिंता मिटली आहे. परतीच्या पावसाला काही दिवस बाकी असताना त्याअगोदरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेणापूर तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला. दरवर्षी परतीच्या पावसामध्ये रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडले जाते. मात्र गतवर्षी संपूर्ण पावसाळात व परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मध्यम प्रकल्पात कमी जलसाठा होता. मध्यम प्रकल्पात यंदा जुनपर्यंत केवळ १.५ टक्के जलसाठा होता.

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. त्यानंतर पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यात वाढ होत गेली. २४ जुलैला ३१.१५ टक्के जलसाठा झाला. पुन्हा २४ व २५ जुलै रोजी तालुक्यात व प्रकल्प क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पात एक दिवसात पंधरा टक्क्याने पाणी वाढवून हा प्रकल्प २६ जुलैच्या सकाळी दहा वाजेपर्यंत ५१.९२ टक्के भरला आहे. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ६४.३१ टक्के साठा झाला आहे. प्रकल्प भरत असल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांची तसेच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनेची चिंता मिटली असून, याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्यासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, अद्याप परतीचा पाऊस बाकी असल्याने आगामी काळात पाण्याची आवक पाहता रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे.

परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होणार....रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला तर या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पानगाव, भंडारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, वाला, वालेवाडी, घनसरगाव, रेणापूर आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. प्रकल्प ६४ टक्के भरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू शकतात. खरीप हंगाम संपल्यावर ऊसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पाणीसाठा चांगला झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३.२२० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा १४.३५० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ६४.३१ असल्याची माहिती रेणा प्रकल्प शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली. जुनच्या सुरुवातीला प्रकल्पात केवळ १.५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, ८ जुनपासून सुरु झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी