शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा!

By संदीप शिंदे | Updated: August 28, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती.

रेणापूर ( लातूर) : तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची चांगली हजेरी आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ६४.३१ टक्के भरला असून, शेतकऱ्यांची व नागरिकांची चिंता मिटली आहे. परतीच्या पावसाला काही दिवस बाकी असताना त्याअगोदरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेणापूर तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला. दरवर्षी परतीच्या पावसामध्ये रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडले जाते. मात्र गतवर्षी संपूर्ण पावसाळात व परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मध्यम प्रकल्पात कमी जलसाठा होता. मध्यम प्रकल्पात यंदा जुनपर्यंत केवळ १.५ टक्के जलसाठा होता.

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. त्यानंतर पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यात वाढ होत गेली. २४ जुलैला ३१.१५ टक्के जलसाठा झाला. पुन्हा २४ व २५ जुलै रोजी तालुक्यात व प्रकल्प क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पात एक दिवसात पंधरा टक्क्याने पाणी वाढवून हा प्रकल्प २६ जुलैच्या सकाळी दहा वाजेपर्यंत ५१.९२ टक्के भरला आहे. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ६४.३१ टक्के साठा झाला आहे. प्रकल्प भरत असल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांची तसेच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनेची चिंता मिटली असून, याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्यासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, अद्याप परतीचा पाऊस बाकी असल्याने आगामी काळात पाण्याची आवक पाहता रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे.

परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होणार....रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला तर या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पानगाव, भंडारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, वाला, वालेवाडी, घनसरगाव, रेणापूर आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. प्रकल्प ६४ टक्के भरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू शकतात. खरीप हंगाम संपल्यावर ऊसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पाणीसाठा चांगला झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३.२२० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा १४.३५० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ६४.३१ असल्याची माहिती रेणा प्रकल्प शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली. जुनच्या सुरुवातीला प्रकल्पात केवळ १.५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, ८ जुनपासून सुरु झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी