शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रेणापूरात अवैध दारुविक्री विरोधात रस्तारोको; बिटरगावचे ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:08 IST

तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़

ठळक मुद्दे तहसीलदारांनी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही आंदोलनकर्ते आक्रमकच होते़पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन काही वेळाने सोडून दिले़

रेणापूर (लातूर ) : तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़ दरम्यान, तहसीलदारांनी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही आंदोलनकर्ते आक्रमकच होते़ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन काही वेळाने सोडून दिले़

रेणापूर तालुक्यातील बिटरगाव व परिसरात काही महिन्यांपासून अवैध दारुविक्रीचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गावात दररोज तंटे वाढले आहेत़ मद्यपींची संख्या वाढल्याने गावातील महिला, मुली व नागरिकांना त्रास होत आहे़ त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अवैध दारुविक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी १६ एप्रिल रोजी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती़ दोन दिवसांच्या कालावधीत कुठलीही कारवाई न झाल्याने बिटरगावच्या महिला व नागरिकांनी १८ एप्रिल रोजी रेणापूर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या़ पोलीस ठाण्यात तब्बल तासभर ठिय्याही मांडला होता़ तेव्हा नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते़ परंतु, प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा मंगळवारी गावातील नागरिक आक्रमक झाले़ 

गाव व परिसरातील अवैध दारुविक्री बंद करावी, हातभट्टी दारुचे अड्डे उध्दवस्त करावेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अशा मागण्यांसाठी पिंपळफाटा येथे नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले़ हे आंदोलन दयानंद सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले़ यावेळी भैय्यासाहेब सरवदे, कृष्णकांत वाघमारे, बालाजी सरवदे, शांताबाई सरवदे, सिंधूताई हानवते, मधुबाला सरवदे, रामकिशन हानवते, वसंत सरवदे, सुरेखा सरवदे, आशा वाघमारे, सुरेश वाघमारे, आम्रपाली सरवदे, सतीश हानवते, दत्ता उपाडे, पद्मीनबाई सरवदे आदी सहभागी झाले होते़

दरम्यान, आंदोलनकर्त्यांची तहसीलदारांनी भेट घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ परंतु, कार्यवाही केल्याशिवाय आम्ही आपले आंदोलन मागे घेत नाही, असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता़ त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़ काही वेळानंतर सोडून देण्यात आले़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोनि़ बी.पी. मुंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

पाऊण तास वाहतूक ठप्प़़पिंपळफाटा येथे हे आंदोलन करण्यात आल्याने दुपारी जवळपास पाऊणतास वाहतूक ठप्प झाली होती़ आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते़ यापूर्वीही आंदोलन केले होते़ परंतु, प्रशासन आणि पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा हे आंदोलन करावे लागत असल्याचे दयानंद सरवदे यांनी सांगितले़ अवैध दारुविक्री वाढल्याने गावात तंट्यांचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गावात वाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :agitationआंदोलनhighwayमहामार्गLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूर