शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपले; पाच गावांत सर्वत्र अंधारच अंधार..!

By राजकुमार जोंधळे | Updated: May 14, 2025 04:09 IST

हलगरा उपकेंद्रात बिघाड : दुरुस्तीचे काम सुरु...

राजकुमार जाेंधळे. औराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यातील हलगरा (ता. निलंगा) परिसरातील गावांना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झाेपडून काढले. परिणामी, हलगरा येथील वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

मंगळवारी सायंकाळी हलगरा परिसरात दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यामध्ये हलगरा येथील वीज उपकेंद्रातील मुख्य रोहित्रामधून अचानक धूर निघाल्याने ते बंदा झाले. यामुळे या केंद्रातून परिसरातील गावांना पुरवठा हाेणार वीज पुरवठा बंद झाला. हलगरा, तगरखेडा, हालसी, तांबरवाडी आणि हनुमंतवाडी या गावांचा वीजपुरवठा सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने ही गावे अंधारात बुडाली. उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली. हलगरा परिसरात या गावांचा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. गत काही दिवस झाले सायंकाळच्या सुमारास अचानक हलके वारे सुटत आहे. अजून-मधून हलक्या पावसाच्या सरीही काेसळत आहेत. अशा वाऱ्यातच वीजपुरवठा तासन् तास खंडित होत आहे. मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न...

दरम्यान, नागरिकांनी औराद येथील सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही, असे नागरिकांनी सांगितले. औराद येथे प्रभारी अभियंता पद दिले असून, नागरिकांना सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे. हलगरा येथील उपकेंद्रातील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. ताे दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असे महावितरणचे उपविभागीय अभियंता सावळे म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस