शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नवीन धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित ...

लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित करणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विद्याभारती या संस्थेचे पश्चिम क्षेत्र मंत्री शेषाद्री डांगे यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांना नुकताच राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते देण्यात आला. यानिमित्त केशवराज संकुलात तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. मिलिंद पाटील यांच्या हस्ते नितीन शेटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, यावेळी डांगे बोलत होते. यावेळी स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेश चापसी, समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर, वर्षा नितीन शेटे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, केंद्रीय विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, केशवराज शैक्षणिक संकुलाचे पालक विवेक अयाचित, मुख्याध्यापक संजय विभुते, कमलाकर पाटील, ॲड. विश्वनाथराव जाधव, डॉ. मनोज शिरुरे यांची उपस्थिती होती.

शेषाद्री डांगे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणावर प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने एक प्रशिक्षण केंद्र चालू करावे, त्यातून राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देण्याची सर्व व्यवस्था संस्थेने उभी करावी.

नितीन शेटे म्हणाले, वंचित समाजातील छोट्या-छोट्या कामासाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. गत दहा वर्षांपासून आपण समाजातील वंचित व उपेक्षितांसाठी काम निष्ठेने केले व यापुढेही करत राहू. प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी तुंगीकर यांनी केले. पर्यवेक्षक संजय कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन राजश्री कुलकर्णी यांनी केले.