शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 27, 2024 17:03 IST

हजारो समाजबांधवांचा सहभाग; आरोपींना अटक करण्याची मागणी

रेणापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच घटनेतील सुत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दीड वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या घटनेची नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे व आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, खुनप्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्या हस्ते तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळफाटा येथे चक्काजाम आंदोलन...सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एकूण चार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी रोजी रेणापूर-पिंपळ फाटा येथे चक्काजाम आंदोलन होणार आहे. शुक्रवारी मोर्चेकऱ्यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा...संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, मी रेणापूर तालुक्यातील वाला येथील नात आहे. आमच्या कुटुंबाच्या न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा. आमच्या कुटुंबावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. माझ्या वडिलांनी कुटूंबापेक्षा समाजाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरवही झाला. शासनाने आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणlaturलातूरagitationआंदोलन