शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 27, 2024 17:03 IST

हजारो समाजबांधवांचा सहभाग; आरोपींना अटक करण्याची मागणी

रेणापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच घटनेतील सुत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दीड वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या घटनेची नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे व आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, खुनप्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्या हस्ते तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळफाटा येथे चक्काजाम आंदोलन...सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एकूण चार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी रोजी रेणापूर-पिंपळ फाटा येथे चक्काजाम आंदोलन होणार आहे. शुक्रवारी मोर्चेकऱ्यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा...संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, मी रेणापूर तालुक्यातील वाला येथील नात आहे. आमच्या कुटुंबाच्या न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा. आमच्या कुटुंबावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. माझ्या वडिलांनी कुटूंबापेक्षा समाजाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरवही झाला. शासनाने आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणlaturलातूरagitationआंदोलन