शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 27, 2024 17:03 IST

हजारो समाजबांधवांचा सहभाग; आरोपींना अटक करण्याची मागणी

रेणापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच घटनेतील सुत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दीड वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या घटनेची नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे व आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, खुनप्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्या हस्ते तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळफाटा येथे चक्काजाम आंदोलन...सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एकूण चार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी रोजी रेणापूर-पिंपळ फाटा येथे चक्काजाम आंदोलन होणार आहे. शुक्रवारी मोर्चेकऱ्यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा...संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, मी रेणापूर तालुक्यातील वाला येथील नात आहे. आमच्या कुटुंबाच्या न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा. आमच्या कुटुंबावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. माझ्या वडिलांनी कुटूंबापेक्षा समाजाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरवही झाला. शासनाने आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणlaturलातूरagitationआंदोलन