शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

बेलकुंड येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST

औसा तालुक्यातील माेठे गाव बेलकुंड आहे. येथे भादा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी आहे. गत अनेक वर्षांपासून येथे ...

औसा तालुक्यातील माेठे गाव बेलकुंड आहे. येथे भादा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी आहे. गत अनेक वर्षांपासून येथे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही या प्रस्तावर ठाेस निर्णय झाला नाही. बेलकुंड येथील पाेलीस चाैकीच्या कार्यक्षेत्रात बेलकूंड, मातोळा, उजनी, एकंबी, टाका आणि परिसरातील गावांचा, वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी केवळ चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. दिवसेंदिवस गावांचा विस्तार होत असून, लोकसंख्येचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्याचबराेबर येथे बँका, टपाल कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालये आहेत. शिवाय, साखर कारखाना असून, बेलकूंड, उजनी, मातोळा, टाका, आशिव येथे आठवडी बाजार भरताे. नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून जाताे. गत काही वर्षात या परिसरात गुन्हेगारीचा टक्का वाढत आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लुटणे, दरोडा टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत. आशिव, उजनी गावात माेठ्या चोरीच्या घटना घडल्या असून, याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना भादा येथे जावे लागते. हे अंतर जवळपास ४० किलाेमीटरचे आहे. बेलकूंड येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे. तो अद्यापही प्रलंबित असून, त्याबाबत पाेलीस प्रशासनाकडूनही पाठपुरावा सुरु आहे, असे भादा पाेलीस ठाण्यातचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप भारती म्हणाले.