शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: March 15, 2025 13:26 IST

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

लातूर : राजस्थानातून लातुरात व्यवसायासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवरील हरंगुळ रेल्वे स्थानकानजीक पाण्याच्या टाकीलागत येथे घडली. शिवाजीनगर ठाण्यालगतच्या फुटपाथवर गुरुवारी झालेल्या खुनाच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या खुनाची घटना घडली. या सलग खुनाच्या घटनांनी लातूर हादरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी पहाटेपर्यत सुरु होती. 

पोलिसांनी सांगितले, राजस्थान येथून लातुरात पोट भरण्यासाठी आलेल्या दोघा भावंडांनी बार्शी रोडवर हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरीचा ठेला लावला होता. तर मोठा भाऊ हरंगुळ मार्गावर एका ऑइल मीलसमोर ठेला लावला होता. नेहमीप्रमाणे 19 वर्षीय युवकाने शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरीचा ठेला लावला. दरम्यान, रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले. चाकूने पोटात भोसकले. यामध्ये पाणीपुरीवला युवक जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पळ काढला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला देण्यात आली. भावाने घटनास्थळी धाव घेत, लातुर येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत मयत युवकाच्या भावाच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दोन रात्र...दोन खून...

गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री सलग दोन खुनाच्या घटना घडल्या असून, लातूर शहर आणि जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या खुनाची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच रात्री खुनाची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी लातूर हादरले आहे. 

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

पाणीपुरीवाल्या युवकाचा खून नेमका कोणत्या कारणांसाठी करण्यात आला आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके मागावर आहेत. आरोपीच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस