शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: March 15, 2025 13:26 IST

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

लातूर : राजस्थानातून लातुरात व्यवसायासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवरील हरंगुळ रेल्वे स्थानकानजीक पाण्याच्या टाकीलागत येथे घडली. शिवाजीनगर ठाण्यालगतच्या फुटपाथवर गुरुवारी झालेल्या खुनाच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या खुनाची घटना घडली. या सलग खुनाच्या घटनांनी लातूर हादरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी पहाटेपर्यत सुरु होती. 

पोलिसांनी सांगितले, राजस्थान येथून लातुरात पोट भरण्यासाठी आलेल्या दोघा भावंडांनी बार्शी रोडवर हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरीचा ठेला लावला होता. तर मोठा भाऊ हरंगुळ मार्गावर एका ऑइल मीलसमोर ठेला लावला होता. नेहमीप्रमाणे 19 वर्षीय युवकाने शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरीचा ठेला लावला. दरम्यान, रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले. चाकूने पोटात भोसकले. यामध्ये पाणीपुरीवला युवक जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पळ काढला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला देण्यात आली. भावाने घटनास्थळी धाव घेत, लातुर येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत मयत युवकाच्या भावाच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दोन रात्र...दोन खून...

गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री सलग दोन खुनाच्या घटना घडल्या असून, लातूर शहर आणि जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या खुनाची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच रात्री खुनाची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी लातूर हादरले आहे. 

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

पाणीपुरीवाल्या युवकाचा खून नेमका कोणत्या कारणांसाठी करण्यात आला आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके मागावर आहेत. आरोपीच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस