शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: March 15, 2025 13:26 IST

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

लातूर : राजस्थानातून लातुरात व्यवसायासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवरील हरंगुळ रेल्वे स्थानकानजीक पाण्याच्या टाकीलागत येथे घडली. शिवाजीनगर ठाण्यालगतच्या फुटपाथवर गुरुवारी झालेल्या खुनाच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या खुनाची घटना घडली. या सलग खुनाच्या घटनांनी लातूर हादरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी पहाटेपर्यत सुरु होती. 

पोलिसांनी सांगितले, राजस्थान येथून लातुरात पोट भरण्यासाठी आलेल्या दोघा भावंडांनी बार्शी रोडवर हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरीचा ठेला लावला होता. तर मोठा भाऊ हरंगुळ मार्गावर एका ऑइल मीलसमोर ठेला लावला होता. नेहमीप्रमाणे 19 वर्षीय युवकाने शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरीचा ठेला लावला. दरम्यान, रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले. चाकूने पोटात भोसकले. यामध्ये पाणीपुरीवला युवक जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पळ काढला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला देण्यात आली. भावाने घटनास्थळी धाव घेत, लातुर येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत मयत युवकाच्या भावाच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दोन रात्र...दोन खून...

गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री सलग दोन खुनाच्या घटना घडल्या असून, लातूर शहर आणि जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या खुनाची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच रात्री खुनाची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी लातूर हादरले आहे. 

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

पाणीपुरीवाल्या युवकाचा खून नेमका कोणत्या कारणांसाठी करण्यात आला आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके मागावर आहेत. आरोपीच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस