शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2024 19:27 IST

सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.

लातूर : गतवर्षीच्या खरिपात पावसाने २१ पेक्षा अधिक दिवसांचा ताण दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीमवर बोळवण करण्यात आली; मात्र त्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी न झाल्याने जवळपास एक कोटी बँकेत पडून आहेत. केवायसीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सहा महिन्यांपासून हे शेतकरी सापडत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होता. दरम्यान, पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीस दिले; परंतु पीक विमा कंपनीने केवळ ३२ मंडळांतील ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपये उपलब्ध करून दिले.

औसा तालुक्यास सर्वाधिक लाभ...तालुका - लाभधारक खातेदारअहमदपूर - ३७१५औसा - ७९२६०चाकूर - ५६०९८देवणी - ७२७जळकोट - १९६१५लातूर - ७३६१३निलंगा - ६०२८६रेणापूर - १०८५६शिरुर अनं. - १०१४३उदगीर - ११४७३एकूण - ३२५७८६

ई- केवायसीसाठी कृषीचा पाठपुरावा...हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या लाभासाठी शेतकऱ्याचे बँक खात्याशी ई- केवायसी असणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी नाही. त्यामुळे सहा महिन्यांपासून पीक विम्याची रक्कम पडून आहे. ई- केवायसी पूर्ण करावी, म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

नुकसान हजारांत, भरपाई शेकड्यात...जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदारांना २५ टक्के अग्रीम उपलब्ध झाला असला तरी त्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा कमी भरपाई मिळाली आहे. त्यामुळे नांगरणी, बी- बियाणे, खते, कीटकनाशक फवारणीसाठीचा खर्च आणि अग्रीमच्या रकमेचा ताळेबंद केल्यास नुकसान हजारांमध्ये आणि भरपाई शेकड्यात अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

कृषी कर्मचाऱ्यांना सातत्याने सूचना...गतवर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीमची रक्कम बहुतांश खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे; मात्र दीड हजार खातेदारांनी ई- केवायसी केली नाही. ती पूर्ण करावी म्हणून सातत्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. त्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र