शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2024 19:27 IST

सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.

लातूर : गतवर्षीच्या खरिपात पावसाने २१ पेक्षा अधिक दिवसांचा ताण दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीमवर बोळवण करण्यात आली; मात्र त्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी न झाल्याने जवळपास एक कोटी बँकेत पडून आहेत. केवायसीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सहा महिन्यांपासून हे शेतकरी सापडत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

गतवर्षीच्या खरिपात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होता. दरम्यान, पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीस दिले; परंतु पीक विमा कंपनीने केवळ ३२ मंडळांतील ३ लाख २५ हजार ७८६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपये उपलब्ध करून दिले.

औसा तालुक्यास सर्वाधिक लाभ...तालुका - लाभधारक खातेदारअहमदपूर - ३७१५औसा - ७९२६०चाकूर - ५६०९८देवणी - ७२७जळकोट - १९६१५लातूर - ७३६१३निलंगा - ६०२८६रेणापूर - १०८५६शिरुर अनं. - १०१४३उदगीर - ११४७३एकूण - ३२५७८६

ई- केवायसीसाठी कृषीचा पाठपुरावा...हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या लाभासाठी शेतकऱ्याचे बँक खात्याशी ई- केवायसी असणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी नाही. त्यामुळे सहा महिन्यांपासून पीक विम्याची रक्कम पडून आहे. ई- केवायसी पूर्ण करावी, म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

नुकसान हजारांत, भरपाई शेकड्यात...जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदारांना २५ टक्के अग्रीम उपलब्ध झाला असला तरी त्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा कमी भरपाई मिळाली आहे. त्यामुळे नांगरणी, बी- बियाणे, खते, कीटकनाशक फवारणीसाठीचा खर्च आणि अग्रीमच्या रकमेचा ताळेबंद केल्यास नुकसान हजारांमध्ये आणि भरपाई शेकड्यात अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

कृषी कर्मचाऱ्यांना सातत्याने सूचना...गतवर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीमची रक्कम बहुतांश खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे; मात्र दीड हजार खातेदारांनी ई- केवायसी केली नाही. ती पूर्ण करावी म्हणून सातत्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. त्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र