शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

By आशपाक पठाण | Updated: December 8, 2024 18:46 IST

याचिकाकर्त्याने वक्फ न्यायाधीकरणात तक्रार केल्याने निघाल्या समन्स

लातूर / अहमदपूर : राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधिकरणात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान यांच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०३ शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना ३० मे रोजी नोटिसा बजावण्यात आल्या. एकाचवेळी शंभरावर शेतकऱ्यांना नोटिसा आल्याने अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले. यावर आता २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटीशीसी वक्फ बोर्डाचा संबंध नसल्याचे रविवारी बाेर्डाने स्पष्ट केले आहे.

तळेगावच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने याचिका क्र . १७/ २०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना ३० मे २०२४ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये, वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. न्यायाधिकरणास उत्तर देण्यास सक्षम असलेली एखादी व्यक्ती असेल, दाव्याचे उत्तर आणि हजेरीसाठी निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी, अपीलच्या अंतिम निकालासाठी नियुक्त केले गेले आहे, त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे.

तीन पिढ्यांपासून जमीन कसतो...

माझी पाच एकर जमीन आहे. आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसतो. आमच्याकडे खासरा पानी नक्कल, सात-बारा आदी पुरावे आहेत. २० डिसेंबर रोजी औरंगाबाद वक्फ न्यायाधिकरणाकडे हे पुरावे वकिलांमार्फत सादर करणार आहोत. एकाचवेळी गावातील १०३ शेतकऱ्यांना नोटिसा आल्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. - तुकाराम कानवटे, शेतकरी, तळेगाव.

शासनाकडून शपथपत्र दाखल केले जाईल...तळेगाव येथील १०३ शेतकऱ्यांच्या जवळपास ३०० एकर जमिन प्रकरणी शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधीकरणाच्या नोटीसा आल्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. -उज्जवला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.

राज्य वक्फ बोर्डाचा संबंध नाही...तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसा एका व्यक्तीने वक्फ ट्रिबुनल कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही गावच्या जमीनीवर दावा केलेला नाही. - समीर काजी, अध्यक्ष, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी