ना शाळा, ना परीक्षा; तरीही साडेपाच लाख विद्यार्थी पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:27+5:302021-06-22T04:14:27+5:30
जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा ...

ना शाळा, ना परीक्षा; तरीही साडेपाच लाख विद्यार्थी पास !
जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने सदरील वर्ग बंद करण्यात आले. सध्या अनलॉक होत असले तरी शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५ लाख ५० हजार २३४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
वर्गनिहाय विद्यार्थी...
पहिली - ४६७७८
दुसरी - ४६७३३
तिसरी - ४६६२१
चौथी - ४७६९९
पाचवी - ४९२१५
सहावी - ४८४८८
सातवी - ४९६३७
आठवी - ४९२९३
नववी - ४८४६५
दहावी - ४७२९४
अकरावी - ३३५९३
बारावी - ३६४१८
जि.प.शाळा - १२८४
माध्यमिक शाळा - ५७०
कनिष्ठ महाविद्यालये - २९८
ऑनलाईन शिक्षण...
फायदे - कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांचे आराेग्यहित लक्षात घेता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला.
घरच्या घरीच मुलांचा अभ्यास होत आहे. सोबतच शाळांच्या वतीने नियमित तासिकांचे नियोजन करण्यात येत आहे.
शाळेत गेल्यास अनेकांशी विद्यार्थ्यांचा संपर्क येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात ऑनलाईनचा पर्याय चांगला वाटतो.
तोटे - जिल्ह्यात अनेक बालके मोबाईलची सुविधा नसल्याने ऑनलाईन अभ्यासापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचले नाही.
अनेक गावात नेटवर्कचा अडथळा असल्याने ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी आहे.
ऑनलाईन शिक्षणांत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणच बरे असा पालकांचा आग्रह आहे.
शहरे - शहरात ऑनलाईन अभ्यासक्रमाला गती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग आहे. शाळांच्या वतीनेही अभ्यासावर भर दिला जात आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातून शंकाचे निरसन होत नसल्याची ओरड आहे. खासगी शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतली जात आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.
खेडेगाव - कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे पहिली ते चौथी तसेच आठवीपर्यंतची मुले आर्थिक अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.
गावात नेटवर्किंगचा अडथळा तसेच सोयी-सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा सुरु होतील तेव्हाच मुले अभ्यास करायला लागतील अशी पालकांना आशा आहे.