शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदी स्टेजवर उद्धव ठाकरेंचा हातात हात धरूनच आले, 'छोटा भाऊ' म्हणाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:00 IST

एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. 

औसा - महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा यांच्यात युतीत अनेकदा मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यांच्यातून युतीत अनेक ठिणग्या पडल्याचं दिसून आलं आहे. एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. 

यावेळी सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आगमन झाले. तेव्हा व्यासपीठावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा हात हातात घेत व्यासपीठावर एन्ट्री केली. त्यामुळे मागील साडेचार वर्षात शिवसेना-भाजपामधलं सुरु असलेलं भांडण आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं बोललं जातंय. 

मात्र महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे असे शिवसेना नेते छातीठोकपणे सांगत असतात, भाजपाचे नेतेही राज्यभरात आम्ही मोठे भाऊ म्हणून प्रचार करतात. अशातच आज व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना नरेंद्र भाई असा उल्लेख करुन केली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात भाषणात माझा छोटा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.  

लातूर येथे महाआघाडीच्या सभेनिमित्त अनेक दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. युती जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकेचे बाण चालवण्यात येत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी भाजपा-शिवसेनेने आपापसातले वाद मिटवत पुन्हा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. विरोधकांवर शिवसेना-भाजपाच्या युतीवर तोंडसुख घेतले. 

या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या संकल्पपत्राचं कौतुक करत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये जी वचनं दिली गेली आहेत तीच वचनं आणि त्याच कारणांसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी झाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर आधीचे सरकार अतिरेक्यांसमोर किंबहुना दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारे होते, पण आजचं आपलं हे सरकार पाकिस्तानने जर का कुरापत काढली तर नुसते बोलत नाही तर पाकिस्तानला ठोकतो आणि ठोकणारचं असं सांगत उद्धव ठाकरेंनी तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019