शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका

By संदीप शिंदे | Updated: December 15, 2023 16:27 IST

वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे.

औराद शहाजानी : मध्यंतरी बंगालच्या उपसागरात मिचँग वादळ निर्माण झाल्याने काही भागात हलका तर मध्यम पाऊस झाला. अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने सुरू झालेली थंडी काही दिवसांपुर्वी तापमान वाढीने नाहीशी झाली होती. मात्र, आता परत साेमवारपासून वातावरण स्वच्छ हाेताच थंडी सुरु झाली आहे. शुक्रवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ७.५ किमान तापमान पोहचले असून, तेरणाकाठ गारठला आहे.

साेमवारी ढगाळ वातावरण कमी झाल्याने थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. किमान तापमान १७ वरुन खाली येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी १५ अंश, बुधवारी १४, गुरुवारी १२ अंशावर तापमान खाली येत शुक्रवारी ७.५ अंशापर्यंत निचांकी स्तरावर पाेहचले. उत्तर भारतातून गेल्या काही दिवसापासून थंड गारवा महाराष्ट्रात येत असून, गारव्याने पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी औराद हवामान केंद्रावर ७.५ अंश किमान तर कमाल २९ अंश तापमानाची नोंद झाली.

औराद शहाजानी परिसरात मध्यंतरी वातावरणात बदल हाेऊन ढगाळ वातावरण तयार झाले हाेते. काही ठिकाणी हलका पाऊस झाला. यावर्षी सतत ढगाळ वातावरण व धुके पडत राहिल्याने पिकांना माेठा फटका बसला आहे. यातच थंडी कमी हाेऊन कमाल व किमान तापमानात वाढ झाली हाेती. आता साेमवारपासून उत्तरेकडे थंड वारा वाहु लागला असल्याने गारठा वाढुन औराद शहाजानी परीसरातील तापमानाची यावर्षातील निच्चांकी नोंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.

धुक्यात शाेधावा लागताेय महामार्ग...वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. मागील आठवड्यात धुक्यात लातूर-जहिराबाद महामार्गावर वाहन चालकांना रस्ता शाेधावा लागला होता. नदीकाठच्या भागात पहाटे धुके, दवबिंदू पडणे हे नित्याचे झाले आहे. पिकांना थंडी बाधली असून किमान तापमान दहा अंशाच्या आत आल्याने पिके पिवळी पडली आहेत, अन्न प्रक्रिया मंदावली आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थंडावली असल्याने पिकांची फुल व फळगळ वाढली असल्याचे शेतकरी विठ्ठल अंचुुळे म्हणाले.

थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या...मंडळ कृषी अधिकारी रणजित राठाेड म्हणाले, बागेत सांयकाळी व पहाटे शेतकऱ्यांनी धुर करावा. शक्य असेल तर रात्री पाणी द्यावे. फळबागांना सल्फरचा खताचा डाेस द्यावा. दरम्यान, वाढत्या थंडीने औराद शहाजानीसह परीसरातील गावात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकाेट्या पेटविल्या जात आहेत. गरम उलनचे कपडे, कानटाेपीचा वापर करुन नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. लहान बाळ व वयस्कर नागरिकांना घराबाहेर लवकर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रenvironmentपर्यावरणFarmerशेतकरी