शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 6:38 PM

पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे

- बालाजी कटकेरेणापूर (लातूर ) : पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे तर शहरातील दोन राष्ट्रीयकृत बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेण्यास नकार देत आहेत़ त्यामुळे अनेक बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे़

रेणापूर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे़ यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक आॅफ इंडिया या दोन बँका वगळता अन्य दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांकडून बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाहीत़ याउलट महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारवर आॅनलाईन पीकविमा भरा, असा सल्ला देत आहेत़ आमच्याकडे पुरेसी यंत्रणा नसल्याचे सांगून हात वर करीत आहेत़

त्यातच महा-ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाले आहे़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे़ पीकविमा भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने पीकविमा कुठे भरावा, असा सवाल बिगर कर्जदार शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़ त्यामुळे शासनाने पीकविम्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच सर्व बँकांनी विमा भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे़

सोसायटीचे दीड हजार थकबाकीदाऱ़़रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे १ हजार ५०० शेतकरी थकबाकीदार आहेत़ मात्र या सोसायटीची दत्तक बँक थकबाकीदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाही़ या शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असा सल्ला देत आहे़ सोसायटीचे सभासद असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी सोसायटी प्रशासनाकडून कोणतेही व्यवस्था करण्यात आली नसल्याने हे दीड हजार शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़

सोसायटीस परवडणारे नाही़सोसायटीचे चेअरमन देविदास कातळे म्हणाले, या शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा, यासाठी सोसायटीने व्यवस्था करणे अवघड आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असे म्हणाले़

पुरेशा यंत्रणेचा अभावस्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी दिनेश मोहरिया म्हणाले, बँकेकडे मनुष्यबळाची पुरेशी यंत्रणा नाही़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा घेतला जात नाही़ यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पीकविमा घेतला जाईल, असे सांगितले़ दररोजचे व्यवहार तसेच पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे व कर्जदारांची संख्या जास्त असल्याने बिगर कर्जदारांचा पीकविमा घेतला जात नाही़ त्यांचाही पीकविमा लवकरच भरुन घेतला जाईल, असे सेंट्रल बँकेचे मुख्य प्रबंधक उल्हास शिवदेव यांनी सांगितले़

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाdigitalडिजिटलFarmerशेतकरी