शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सरासरीपेक्षा अधिक पावसाने सुखावले लातूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:31 IST

जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. लातूर शहराचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावर आहे, त्या प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

लातूर : लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६९३ मि.मी. असून आतापर्यंत ७२७.०३ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदासरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने लातूरकर सुखावले आहेत. जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे.

लातूर शहराचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावर आहे, त्या प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निम्न तेरणा प्रकल्पातही ५२ दलघमी पाणी साठा झाला असून, लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. देवर्जन, साकोळ १०० टक्के भरले असून, रेणापूर, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातही बऱ्यापैकी पाणी साठा झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत लातूर तालुक्यात ६३३, औसा ७६२, अहमदपूर ७५६, निलंगा ७६७, उदगीर ७३२, चाकूर ६३७, रेणापूर ७२५, देवणी ८५५, शिरूर अनंतपाळ ६९६ तर जळकोट तालुक्यात ८४८ मि.मी. पाऊस झाला आहे.

लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर आदी शहरांना पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात ४७.१४ टक्के पाणी साठा झाला आहे. यातील ३३.०७ टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. १ जूनपासून या प्रकल्पामध्ये ९८.७९२ दलघमी नव्याने पाणी साठा झाला आहे. लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

सद्यस्थितीत प्रकल्पात एकूण १०५. ६५८ दलघमी पाणी साठा झाला आहे. यातील ५८.५२८ दलघमी पाणी साठा उपयुक्त आहे.

प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता २२४.०९ दलघमी असून, उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता १७६.९६ दलघमी आहे. तर मृतसाठा ४७.१३० दलघमी आहे. पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी ६३८.७५ मीटर असल्याचे शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरRainपाऊस