शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Latur: पूर्वसूचना न देता बंधाऱ्यातून सोडले पाणी; पुरात वाहून गेल्याने माय-लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:24 IST

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे दोन बळी; कापूस वेचणीसाठी पुलावरून शेताकडे निघाल्या होत्या दोघी, गावावर शोककळा

जळकोट (जि. लातूर) : कापूस वेचणीसाठी तिरुरू नदीपात्रातील पुलावरून शेताकडे निघालेल्या कौशल्याबाई अजय वाघमारे (३५) व रुक्मिणी अजय वाघमारे (१२, रा. मरसांगवी, ता. जळकोट) या माय-लेकीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास मरसांगवी येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील अजय वाघमारे हे शेतमजूर आहेत. ते उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासह हाताला मिळेल ती कामे करतात. सोमवारी सकाळी कौशल्याबाई अजय वाघमारे व त्यांची मुलगी रुक्मिणी या दोघी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील कापूस वेचणीसाठी निघाल्या होत्या. या दोघी तिरू नदीपात्रातील जुन्या पुलावरून जात असताना अचानकपणे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आणि काही क्षणात त्या वाहून जाऊन लागल्या. हे पाहून गावातील नागरिकांनी धाव घेतली आणि त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तत्पूर्वी त्या दोघींचा मृत्यू झाला.

कुटुंबाचा आधार हरवलाशेतमजूर अजय वाघमारे यांच्या कुटुंबांत पत्नी कौशल्याबाई, मुलगी रुक्मिणी आणि दोन मुले आहेत. सोमवारी सकाळी रोजंदारीसाठी शेताकडे निघालेल्या कौशल्याबाई आणि मुलगी रुक्मिणी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे अजय वाघमारे यांच्या कुटुंबाचा आधारच हरवला आहे.

गावावर शोककळामरसांगवी येथील माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच नागरिकांनी तिरू नदीपात्राकडे धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. आई आणि बहिणीचा मृतदेह पाहून मुले आक्रोश करीत होती.

रुक्मिणीताई ६ वीच्या वर्गातमयत रुक्मिणी ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. दीपावलीनंतर सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, आईसोबत कामाला जाऊन यावे म्हणून ती शेताकडे निघाली होती, असे नातेवाइकांनी सांगितले.

अचानक पाणी पातळी कशी वाढली?सध्या पाऊस नाही. त्यामुळे तिरू नदीपात्रातील पाणी पातळीत सोमवारी सकाळी अचानक कशी काय वाढ झाली, असा सवाल व्यक्त होत असताना सुल्लाळी येथील बॅरेजेसमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, बॅरेजेसच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.

जुन्या पुलामुळे आपत्तीतिरू नदीपात्रातून मरसांगवीस ये-जा करण्यासाठी जुना पूल आहे. त्या पुलावरून पाणी वाहत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही घटना घडली. विशेषत: याच ठिकाणी एका मुलाचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले कुटुंबियांचे सांत्वनया घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे यांना सूचना केल्या. उपविभागीय अधिकारी शिंदे व तहसीलदार लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, वाघमारे कुटुंबास शासन नियमाप्रमाणे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Mother and daughter drown after dam water release.

Web Summary : In Latur, a mother and daughter drowned after a sudden water release from a dam. They were crossing a bridge on the Tiru River for work when the surge occurred. The incident has cast a pall of gloom over the village.
टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूWaterपाणी