शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वरात अन् लाठीचा प्रसाद देणारे अधिकारी मिळणार?

By राजकुमार जोंधळे | Updated: March 12, 2025 05:32 IST

सहाही आमदारांची घरे लातुरात, कायदा-सुव्यवस्थेची चिंता मिटेल?

लातूर : मंगळवारी सायंकाळी शहरात घडलेल्या मारहाणीच्या भयंकर प्रकाराने लातूरकरांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. दुतर्फा गर्दी, रस्त्यावरून धावणारी वाहने असे दृश्य असताना मुख्य रस्त्याच्या मधोमध कपडे फाटेपर्यंत, जखमी युवकाला अर्धवस्त्र होईपर्यंत बेदम मारहाण झाली. त्यानंतर आरोपींना रस्त्यातून उचलून वरातीने ठाण्यात नेले, तोच काय दिलासा. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी लातूर शहरात अन् जिल्ह्यात आरोपींची वरात काढणारे आणि गरज पडल तिथे लाठीप्रसाद देणारे अधिकारी अलीकडे दिसत नाहीत.

लातूर जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार सत्तेत आहेत. लातूर शहराचे आमदार विरोधी पक्षात आहेत. परंतु, जिल्ह्याचे राजकारण सकारात्मक आणि विकासासाठी एकाच मंचावर येणारे राहिले आहे. तोच विचार कृतीत आणून सर्वांनीच एकत्र येऊन गुन्हेगारांना वठणीवर आणणारे, प्रशासनाला गतिशील करणारे, तालुक्याला, उपविभागाला आणि मोठ्या शहरांना चांगले अधिकारी द्यावेत, अशी अपेक्षा व्यापारी, उद्योजक व्यक्त करीत आहेत. विरोधकांसह सत्तेतील सर्वांचेच लातूर शहरात लक्ष असते. कार्यक्रमांना, सोहळ्यांना हजेरी राहते. जिल्ह्यातील सर्वच आमदारांची घरे लातूर शहराभोवती आहेत. त्या सर्वांनाच कायदा, सुव्यवस्था सुरळीत हवी की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

शांत (!) लातुरात भरदिवसा अर्धवस्त्र होईपर्यंत मारहाण...

शांत (!) म्हटल्या जाणाऱ्या लातूर शहरात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. कपडे फाटेपर्यंत अर्धवस्त्र करून रस्त्यावर बेदम मारहाण सुरू होती. मारहाण करणारे आणि मार खाणारा एकाच गटातील असो की कोणी, परंतु सार्वजनिक ठिकाणी कायदा, सुव्यवस्थेचे तीनतेरा पाहून अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. काही काळ परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रत्यक्ष घटनास्थळी गर्दी असूनही कोणीही समोर गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत नाही.

बरे केले, वरात काढली...

मंगळवारी भरदिवसा घडलेल्या घटनेतील आरोपींना तत्परतेने उचलून पोलिसांनी त्यांची रस्त्याने वरात काढत ठाण्यात नेल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामुळे हाणामारीने धक्का बसलेल्या लातूरकरांना वरातीने दिलासा दिला. बरे केले, वरात काढली, अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमात उमटली.

तरुण, तडफदार अधिकारी लातूरला मिळत नाहीत?

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप कधीकाळी लातूरचे उपविभागीय अधिकारी होते. त्यांनी अनेकांना वठणीवर आणले. गुन्हेगारांवर वचक बसविला. अगदी अलीकडच्या काळात उपाधीक्षक सचिन सांगळे यांचेही काम दखलपात्र राहिले. अलीकडे मात्र तरुण अधिकारी चाकूर अन् तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जातात. आताही आयपीएस अधिकारी चाकूरचे डीवायएसपी आहेत. मंत्रालयातून ही सूत्रे हलतात. तिथे जिल्ह्यातील सत्तेतील आमदार वजन खर्ची करून शहराला चांगले अधिकारी आणतील का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस