शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर, निलंग्यात आंदोलनप्रकरणी काँग्रेसच्या ५३ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST

लातूर, निलंगा - केंद्र शासनाने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसकडून लातूर, निलंगा येथे ...

लातूर, निलंगा - केंद्र शासनाने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसकडून लातूर, निलंगा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने व साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमांतर्गत लातूरमध्ये ३५ तर निलंग्यात १८ अशा एकूण ५३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, संजय ओव्हळ यांच्यासह ३५ जणांवर गांधी चौक पोलीस ठाण्यात कलम १८८, २६९, २७० भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलंगा शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. याठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर, अभय सोळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, गोविंद रामजी शिंगाडे, लाला पटेल, गोविंद सूर्यवंशी, तुराब बागवान, सोमनाथ कदम, सुधाकर पाटील, अजय कांबळे, प्रा. दयानंद चोपणे, नारायण सोमवंशी, महेश देशमुख, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, अपराजित मरगणे, शरद गायकवाड, तानाजी डोके यांच्यासह १८ जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोना संसर्ग वाढेल अशी घातक कृती करून स्वतःच्या व जनतेच्या जीविताला व्यक्तिगत आरोग्याला बाधा पाेहोचवून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता संसर्ग पसरविण्याची हयगय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन....

सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळा गुन्हा दाखल झाला तरी आम्ही मागे हटणार नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे. एकीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ३५ ते ४० लोक घेऊन राज्यपालांना भेटायला जातात, त्यावेळी संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन होत नाही का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी विचारला आहे.