शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जनआरोग्य योजनेचा गोरगरीबांना आधार; लातूरात १० वर्षांत २० हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

By हरी मोकाशे | Updated: February 5, 2024 17:15 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

लातूर : गोरगरिब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी जनआरोग्य योजना कवच ठरत आहे. गत दहा वर्षांत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण २० हजार ३८३ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

राज्यातील गोरगरीब रुग्णांना गंभीर, अतिगंभीर आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार व शस्त्रक्रिया मोफत व्हाव्यात म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड व मुत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लॉस्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, नवजात व बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार अशा प्रकारच्या ९९६ आजारांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत १२०९ गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात.

गतवर्षी ३५४० रुग्णांवर उपचार...वर्ष - उपचार झालेले रुग्ण२०१४ - २८०२०१५ - ५२२२०१६ - ६१४२०१७ - ९४८२०१८ - १८१२२०१९ - २०२७२०२० - २३९२२०२१ - ४३२१२०२२ - ३९२७२०२३ - ३५४०एकूण - २०३८३

विभागात द्वितीय स्थानावर...जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचारात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात पाच वर्षांपासून प्रथम स्थानावर आहे. त्याचबरोबर विभागस्तरावर द्वितीय क्रमांकावर आहे. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला आहे.

योजनेच्या लाभासाठी ही हवी कागदपत्रे...विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना राबविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभासाठी शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्मान कार्ड अशा कागदपत्रांची आवश्यक आहे. या योजनेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.

लाभ देण्यासाठी आरोग्य शिबीर...या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि रुग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दर महिन्यास ग्रामीण भागात मोफत आरोेग्य शिबीर घेण्यात येते. त्यातून औषधोपचार देण्याबरोबर आयुष्मान कार्डही काढून देण्यात येत आहे, असे डॉ. मेघराज चावडा यांनी सांगितले.

योजना आरोग्य विमा कवच...महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत दहा वर्षांत २० हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. या योजना गोरगरीबांसाठी आरोग्य कवच आहे. रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा.- डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल