शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जनसामान्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक ...

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा

लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख उपस्थित होते. विद्यार्थ्यांना महापुरुषांची ओळख व्हावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका रुपाली कोकाटे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षिका नम्रता झांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

निखिल शिवाजी गायकवाड यांना ‘समाजभूषण पुरस्कार’

लातूर : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांचे, हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत होते. अशा अडचणीच्या प्रसंगी निखिल गायकवाड यांनी हडको प्रभागातील लोकांच्या घरोघर जाऊन दैनंदिन भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. रमाई अन्नसेवा योजनेच्या माध्यमातून दररोज पाचशेहून अधिक डबे रुग्णांच्या नातेवाईकांना पुरवले. या कार्याबद्दल त्यांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, रत्नराज जवळगेकर, पूजा निचळे, आकाश गडगडे, विशाल सावंत, गजू गुगळे उपस्थित होते.

लातूर शहरात अभिवादन कार्यक्रम

लातूर : येथील लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाळासाहेब देशपांडे, संजय निलेगावकर, हरिराम कुलकर्णी, पंडित रघुत्तम आचार्य जोशी, डॉ. श्रीनिवास संदीकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, दुभाजकातील कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी मुख्य मार्गातील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होता. या काळात विजेचा लंपडाव सुरु होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे होऊनही विजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नियमित वीजबिलांचा भरणा करुनही विजेची समस्या कायम असल्याने याकडे महावितरणने लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.