झटपट साेयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:24+5:302021-09-16T04:26:24+5:30
सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, ...

झटपट साेयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल...!
सन २०१७च्या हंगामामध्ये ३ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साेयाबीनचा पेरा घेतला हाेता. या पेऱ्यामध्ये दरवर्षी वाढ झाली असून, २०१८मध्ये ३ लाख ५० हजार हेक्टर, २०१९मध्ये ३ लाख ९० हजार हेक्टर, २०२०मध्ये ४ लाख १० हजार हेक्टर आणि २०२१मधील हंगामात ४ लाख २७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी साेयाबीनला प्राधान्य देत आहेत. लातूर जिल्ह्यात साेयाबीनपाठाेपाठ उसाला प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ३० हजार हेक्टरपैकी ४ लाख २७ हजार हेक्टरवर यंदा साेयाबीनचा पेरा झाला आहे.
झटपट येणारे साेयाबीन...
जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या - दुसऱ्या पावसानंतर साेयाबीनचा पेरा केला जाताे. झटपट येणाऱ्या साेयाबीनच्या बियाण्याची लागवड केल्यानंतर जवळपास तीन महिन्यात हे पीक काढणीच्या स्थितीत येते. त्यामुळे प्रारंभीला आणि मध्ये कधीही पावसाने हजेरी लावली तरी या पिकाला त्याचा फायदाच हाेताे.
मध्यम कालावधीत येणारे साेयाबीन...
मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनचा पेरा हादेखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात हाेतो. लागवड झाल्यानंतर ऑक्टाेबर महिन्यात पीक काढणीला येते. सध्याला या पिकाची स्थिती चांगली असून, यंदा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.
जास्त कालावधीत येणारे साेयाबीन...
या साेयाबीनचा कालावधी हा पूर्ण चार महिन्यांचा असताे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या साेयाबीनची काढणी ऑक्टाेबरमध्ये हाेते. जास्त कालावधीसाठी लागवड झालेल्या साेयाबीनच्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसला.
चांगल्याचा पावसाचा फायदा...
यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी, साेयाबीनला फायदा झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबल्याने पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे साेयाबीन पाण्यात हाेते. - दत्तात्रय गावसाने, कृषी अधीक्षक, लातूर
मध्यम कालावधीत येणाऱ्या साेयाबीनपासून शेतकऱ्यांच्या पदरी चांगले उत्पादन मिळेल. सायाेबीन काढणीनंतर लागलीच विक्री करावे, असे नाही. ते घरात ठेवून याेग्य भाव आल्यानंतरही विकता येते. बाजारातील आवक आणि भाव पाहून विक्रीचा निर्णय घेता येताे. शिवाय, रान लवकरच रिकामे हाेते. - हणमंतराव मुळे, किनी
साेयाबीनला यंदाच्या हंगामात प्रतिक्विंटल दहा हजारांवर भाव मिळाला. मात्र, या काळात बाजारातील आवक अल्प हाेती. आवक वाढली की, भाव काेसळतात. हे पीक आर्थिक उत्पन्न देणारे आहे. शिवाय, जमिनीचा पाेतही सुधारण्यासाठी फायदा हाेताे. त्याचबराेबर पशुधनासाठी भुसाही चारा म्हणून मिळताे. साेयाबीनची लागवड शेतकऱ्यांना परवडणारी आहे. - अंबादास चिखले, वाढवणा