शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जंतामुळे खुंटते बालकांची बौद्धिक, शारीरिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST

जंतांमुळे ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असा बालकांवर परिणाम होतो. ...

जंतांमुळे ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असा बालकांवर परिणाम होतो. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक असते. असे आजार उद्भवू नयेत म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत १ मार्चपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे म्हणाले, जंतनाशक ही मोहीम वर्षातून दोनदा राबविण्यात येते. जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांत १ मार्च रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित, आश्रमशाळा, महापालिका शाळा, खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत गोळी देण्यात येणार आहे.

चांगल्या आरोग्यासाठी गोळी गरजेची...

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आहे. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे आरोग्य चांगले राहावे, पोषण चांगले व्हावे, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला- मुलींना जंतनाशक गोळी द्यावी.

- अभिनव गोयल, सीईओ, जिल्हा परिषद

पावणेपाच लाख मुला-मुलींना दिली जाणार गोळी...

जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा एकूण २०११ शाळा आहेत. तेथील ३ लाख २७ हजार ५१९ तसेच अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ मुला-मुलींना जंतनाशक गोळी सोमवारी दिली जाणार आहे. शाळाबाह्य २ हजार ९३६ मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत ही गोळी खाऊ घातली जाणार आहे. एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, अंगणवाडीत न आलेल्या बालकांना आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन ही गोळी देणार आहेत.

- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी