शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषिकांवर अन्याय, सवलतींसाठी महाराष्ट्र शासनाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:15 IST

Maharashtra : उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे.

लातूर : कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावामधील मराठी भाषिक बांधवांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्याकडे महाराष्ट्र शासनाने अधिकचे लक्ष द्यावे. पूर्वीप्रमाणेच सीमाभागातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलतीसह विविध सुविधा द्याव्या, अशी मागणी बिदर जिल्ह्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड बोंथीकर यांनी केली आहे.उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे. १९५१ च्या शिरगणतीप्रमाणे बिदर जिल्ह्यात ३९ टक्के मराठी भाषिक तर कानडी २८ टक्के, तेलुगू १५ टक्के, उर्दू १५ टक्के व इतर १३ टक्के असे प्रमाण होते. आजही या भागातील बहुतांश मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी जनतेच्या लढ्याची महाराष्ट्राने दखल घ्यावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बिदर जिल्हाध्यक्ष रामराव राठोड यांनी महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले आहे. त्यानुसार ८६५ गावातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन यापूर्वी देत असलेली ईबीसी सवलत पूर्ववत करावी, या गावातील नागरिकांना राज्य शासनाच्या सर्व सवलती, सोयी व अधिकार द्यावेत; शालेय शिक्षण, उच्च शिक्षणासाठी दिलेल्या आरक्षणाची टक्केवारी एकीकरण समितीच्या मागणीप्रमाणे वाढवावी, अशी मागणी केली आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी वाचनालय, एकीकरण समितीच्या पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना मुंबई दौऱ्याच्या वेळी आमदार निवासात राहण्याची व्यवस्था करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :marathiमराठीlaturलातूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र