शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात

By राजकुमार जोंधळे | Updated: May 30, 2025 20:26 IST

बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब

अजित चंदनशिवे / तुळजापूर (जि. धाराशिव) : बोअरवेलला लागलेल्या पाण्याच्या आनंदात शिखर शिंगणापूर येथे महादेवला पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी निघालेल्या गीर कुटुंबीयाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यामध्ये पाचवर्षीय बालकासह आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक पुलावर घडली. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोमादेवी जवळगा (जि. औसा) येथील गीर कुटुंबीयाने मागील महिन्यात शेतात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले हाेते. बाेरअच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून स्वतःच्या चार वाहनांतून (एमएच. २४-एयू. ५३८१) जात हाेते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक आला असता, पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला.

दरम्यान, गाडीतील आरडाओरड, नातेवाइकांच्या आक्रोशमुळे रस्त्याने जात असलेल्या ट्रकचालकाने गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेतील पाच वर्षाचा अवधूत अमोल गीर या चिमुकल्यासह नरुत्तम प्रेम गीर (वय ६३) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी अवधूत गीर याला मृत घोषित केले, तर नरुत्तम गीर यांच्यावर उपचार सुरू केले, तर गंभीर जखमी अमोल नरुत्तम गीर (वय ३०), दुर्गा अमोल गीर (वय २४), वैष्णव हनुमंत पुरी (वय २५), गीतांजली अजिंक्य गिरी, जयश्री नरुत्तम गीर (वय ५३) यांना १०८ रुग्णवाहिकेतून तत्काळ घटनास्थळावरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आजी जयश्री निरुत्तम गीर यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेमुळे गीर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जयश्री गीर या आहेत जिल्हा परिषद शिक्षिका...

देव दर्शनासाठी निघालेल्या जयश्री गीर या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या.

जखमींवर सुरू आहेत धाराशिव येथे उपचार...

अपघातात दुर्गा गीर यांच्या पोटचा गोळा मृत झाला आहे, तर गीतांजली गीर यांची जन्म दिलेल्या आई जयश्री यांचा ही मृत्यू झाला. जखमी झालेल्या दुर्गा गीर, वैष्णव पुरी आणि गीतांजली गिरी यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अमोल गीर आणि निरुत्तम गीर हे डिस्चार्ज घेऊन अंत्यविधीसाठी गावाकडे गेले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर