शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात

By राजकुमार जोंधळे | Updated: May 30, 2025 20:26 IST

बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब

अजित चंदनशिवे / तुळजापूर (जि. धाराशिव) : बोअरवेलला लागलेल्या पाण्याच्या आनंदात शिखर शिंगणापूर येथे महादेवला पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी निघालेल्या गीर कुटुंबीयाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यामध्ये पाचवर्षीय बालकासह आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक पुलावर घडली. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोमादेवी जवळगा (जि. औसा) येथील गीर कुटुंबीयाने मागील महिन्यात शेतात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले हाेते. बाेरअच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून स्वतःच्या चार वाहनांतून (एमएच. २४-एयू. ५३८१) जात हाेते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक आला असता, पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला.

दरम्यान, गाडीतील आरडाओरड, नातेवाइकांच्या आक्रोशमुळे रस्त्याने जात असलेल्या ट्रकचालकाने गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेतील पाच वर्षाचा अवधूत अमोल गीर या चिमुकल्यासह नरुत्तम प्रेम गीर (वय ६३) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी अवधूत गीर याला मृत घोषित केले, तर नरुत्तम गीर यांच्यावर उपचार सुरू केले, तर गंभीर जखमी अमोल नरुत्तम गीर (वय ३०), दुर्गा अमोल गीर (वय २४), वैष्णव हनुमंत पुरी (वय २५), गीतांजली अजिंक्य गिरी, जयश्री नरुत्तम गीर (वय ५३) यांना १०८ रुग्णवाहिकेतून तत्काळ घटनास्थळावरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आजी जयश्री निरुत्तम गीर यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेमुळे गीर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जयश्री गीर या आहेत जिल्हा परिषद शिक्षिका...

देव दर्शनासाठी निघालेल्या जयश्री गीर या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या.

जखमींवर सुरू आहेत धाराशिव येथे उपचार...

अपघातात दुर्गा गीर यांच्या पोटचा गोळा मृत झाला आहे, तर गीतांजली गीर यांची जन्म दिलेल्या आई जयश्री यांचा ही मृत्यू झाला. जखमी झालेल्या दुर्गा गीर, वैष्णव पुरी आणि गीतांजली गिरी यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अमोल गीर आणि निरुत्तम गीर हे डिस्चार्ज घेऊन अंत्यविधीसाठी गावाकडे गेले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर