ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्याय देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:38+5:302021-09-14T04:24:38+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या लातूर जिल्हा पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत त्यांची भेट ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्याय देणार
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या लातूर जिल्हा पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत त्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. यावेळी शिष्टमंडळाने वेतनश्रेणी, सुधारित किमान वेतनासह इतर मागण्यांचे निवेदन दिले. सध्या मिळत असलेले मानधन अनेकांना प्रतिदिवस १०० रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यावर घर चालविणे कठीण झाले आहे. यासंदर्भात शासनाकडे वारंवार निवेदने दिली, तरीही तोडगा निघत नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी मंत्री देशमुख म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रशासकीय बैठक घेऊन आपल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे खूप जिव्हाळ्याचे असून, सरकार कोणतेही असो सरकारने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन असूनसुद्धा ग्रामीण भागात २४ तास पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई व इतर सेवेच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उत्पादनाची व वसुलीची अट एकप्रकारे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. कमी वेतन असूनसुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी काम करतात ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे, असेही देशमुख म्हणाल्याचे युनियनचे मराठवाडा अध्यक्ष दयानंद एरंडे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे विभागीय अध्यक्ष दयानंद एरंडे, लातूर जिल्हाध्यक्ष नवनाथ नरवडे, रामेश्वर धुमाळ, निलंगा तालुकाध्यक्ष सतीश मस्के, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष ज्ञानबा कांबळे, औसा तालुकाध्यक्ष हाजोद्दीन शेख, चाकूर तालुका सचिव सलीम शेख, श्याम ठाकूर, बिडवे, परमेश्वर बनसोडे, अमोल गायकवाड, कांतराव तोरसल्ले, महेश चव्हाण, आदीजण उपस्थित होते.