शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

By राजकुमार जोंधळे | Updated: June 30, 2024 22:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे.

लातूर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी लातुरात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी लातुरात रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, मका, पामतेल, दूध भुकटीसह इतर शेतमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. यातूनच शेतकरी नागवला गेला आहे. आर्थिक संकटात अडकल्याने ताे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या आत्महत्या राेखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धाेरण राबवावे लागणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, ॲड. विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही...नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल करत माजी खा. शेट्टी म्हणाले, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरविण्याचाच प्रकार आहे. शेतकऱ्यांचा बळी देऊन हा महामार्ग कशासाठी? यातून काेणाला काय मिळवायचे आहे, हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.

शेतकरी हिताच्या याेजना जाहीर करा...राज्य सरकारने नकाे त्या याेजना जाहीर करण्यापेक्षा शेतकरी हिताच्या याेजना जाहीर कराव्यात. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र, तेच सरकार करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagitationआंदोलन