शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

By राजकुमार जोंधळे | Updated: June 30, 2024 22:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे.

लातूर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी लातुरात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी लातुरात रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, मका, पामतेल, दूध भुकटीसह इतर शेतमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. यातूनच शेतकरी नागवला गेला आहे. आर्थिक संकटात अडकल्याने ताे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या आत्महत्या राेखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धाेरण राबवावे लागणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, ॲड. विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही...नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल करत माजी खा. शेट्टी म्हणाले, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरविण्याचाच प्रकार आहे. शेतकऱ्यांचा बळी देऊन हा महामार्ग कशासाठी? यातून काेणाला काय मिळवायचे आहे, हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.

शेतकरी हिताच्या याेजना जाहीर करा...राज्य सरकारने नकाे त्या याेजना जाहीर करण्यापेक्षा शेतकरी हिताच्या याेजना जाहीर कराव्यात. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र, तेच सरकार करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagitationआंदोलन