शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

By राजकुमार जोंधळे | Updated: June 30, 2024 22:46 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे.

लातूर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी लातुरात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी लातुरात रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, मका, पामतेल, दूध भुकटीसह इतर शेतमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. यातूनच शेतकरी नागवला गेला आहे. आर्थिक संकटात अडकल्याने ताे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या आत्महत्या राेखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धाेरण राबवावे लागणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, ॲड. विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही...नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल करत माजी खा. शेट्टी म्हणाले, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरविण्याचाच प्रकार आहे. शेतकऱ्यांचा बळी देऊन हा महामार्ग कशासाठी? यातून काेणाला काय मिळवायचे आहे, हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.

शेतकरी हिताच्या याेजना जाहीर करा...राज्य सरकारने नकाे त्या याेजना जाहीर करण्यापेक्षा शेतकरी हिताच्या याेजना जाहीर कराव्यात. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र, तेच सरकार करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीagitationआंदोलन