शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

अंत्यविधीला शेतकऱ्यांचा विराेध; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या, स्मशानभूमीसाठी पार्थिव ६ तास रस्त्यावरच

By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 02:52 IST

तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

रेणापूर (जि. लातूर) : अंत्यसंस्कारासाठी धवेली येथील शेतकऱ्यांनी विराेध केल्याने रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने पार्थिव सहा तास रस्त्यावर ठेवत संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडला. तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

धवेली गावची लोकसंख्या चार हजारांवर असून, गावात मातंग समाजाची लोकसंख्या दाेन हजारांच्या घरात आहे. मातंग समाज सोडला तर इतर समाजाला शेती असल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, मातंग समाजाला शेती नसल्याने धवेली-जानवळ रस्त्यालगत शेतातील मसनवाटा आशी शासकीय दफ्तरी नोंद आहे. मात्र, येथे स्मशानभूमीचा वाद गत अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्मशानभूमीची जागा नियोजीत असून, गत तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. दरम्यान, संभाजी पांडुरंग शिंदे (वय ४०) यांचा शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी रविवारी सकाळी सरण रचण्यासाठी लाकडे टाकली हाेती. याला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केला. ऐनवेळी विराेध करण्यात आल्याने अंत्यसंस्कार काेठे करायाचा? असा प्रश्न निर्माण झाला. संतप्त नातेवाईंनी अखेर धवेली-जानवळ रस्त्यावर तब्बल सहा तास पार्थिव ठेवत ठिय्या मांडला. 

या घटनेची माहिती रेणापूर तहसिलदार मंजुषा भगत, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांना मिळाली. त्यांनी प्रशासनाच्यावतीने मध्यस्थी केली. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षानवर्षांपासून मातंग समाज धवेली-जानवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातच अंत्यसंस्कार करतात. ही प्रथा आजही कायम आहे. 

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूPoliceपोलिस