शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

अंत्यविधीला शेतकऱ्यांचा विराेध; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या, स्मशानभूमीसाठी पार्थिव ६ तास रस्त्यावरच

By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 02:52 IST

तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

रेणापूर (जि. लातूर) : अंत्यसंस्कारासाठी धवेली येथील शेतकऱ्यांनी विराेध केल्याने रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने पार्थिव सहा तास रस्त्यावर ठेवत संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडला. तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

धवेली गावची लोकसंख्या चार हजारांवर असून, गावात मातंग समाजाची लोकसंख्या दाेन हजारांच्या घरात आहे. मातंग समाज सोडला तर इतर समाजाला शेती असल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, मातंग समाजाला शेती नसल्याने धवेली-जानवळ रस्त्यालगत शेतातील मसनवाटा आशी शासकीय दफ्तरी नोंद आहे. मात्र, येथे स्मशानभूमीचा वाद गत अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्मशानभूमीची जागा नियोजीत असून, गत तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. दरम्यान, संभाजी पांडुरंग शिंदे (वय ४०) यांचा शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी रविवारी सकाळी सरण रचण्यासाठी लाकडे टाकली हाेती. याला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केला. ऐनवेळी विराेध करण्यात आल्याने अंत्यसंस्कार काेठे करायाचा? असा प्रश्न निर्माण झाला. संतप्त नातेवाईंनी अखेर धवेली-जानवळ रस्त्यावर तब्बल सहा तास पार्थिव ठेवत ठिय्या मांडला. 

या घटनेची माहिती रेणापूर तहसिलदार मंजुषा भगत, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांना मिळाली. त्यांनी प्रशासनाच्यावतीने मध्यस्थी केली. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षानवर्षांपासून मातंग समाज धवेली-जानवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातच अंत्यसंस्कार करतात. ही प्रथा आजही कायम आहे. 

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूPoliceपोलिस