शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीला शेतकऱ्यांचा विराेध; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या, स्मशानभूमीसाठी पार्थिव ६ तास रस्त्यावरच

By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 02:52 IST

तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

रेणापूर (जि. लातूर) : अंत्यसंस्कारासाठी धवेली येथील शेतकऱ्यांनी विराेध केल्याने रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने पार्थिव सहा तास रस्त्यावर ठेवत संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडला. तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

धवेली गावची लोकसंख्या चार हजारांवर असून, गावात मातंग समाजाची लोकसंख्या दाेन हजारांच्या घरात आहे. मातंग समाज सोडला तर इतर समाजाला शेती असल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, मातंग समाजाला शेती नसल्याने धवेली-जानवळ रस्त्यालगत शेतातील मसनवाटा आशी शासकीय दफ्तरी नोंद आहे. मात्र, येथे स्मशानभूमीचा वाद गत अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्मशानभूमीची जागा नियोजीत असून, गत तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. दरम्यान, संभाजी पांडुरंग शिंदे (वय ४०) यांचा शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी रविवारी सकाळी सरण रचण्यासाठी लाकडे टाकली हाेती. याला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केला. ऐनवेळी विराेध करण्यात आल्याने अंत्यसंस्कार काेठे करायाचा? असा प्रश्न निर्माण झाला. संतप्त नातेवाईंनी अखेर धवेली-जानवळ रस्त्यावर तब्बल सहा तास पार्थिव ठेवत ठिय्या मांडला. 

या घटनेची माहिती रेणापूर तहसिलदार मंजुषा भगत, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांना मिळाली. त्यांनी प्रशासनाच्यावतीने मध्यस्थी केली. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षानवर्षांपासून मातंग समाज धवेली-जानवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातच अंत्यसंस्कार करतात. ही प्रथा आजही कायम आहे. 

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूPoliceपोलिस