शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कांदा निर्यातबंदीच्या विरोधासाठी शेतकऱ्यांचे राख-रांगोळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:40 IST

लातूर येथे शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले. यामध्ये निर्यातबंदी आदेशाची होळी करून रांगोळी घालण्यात आली.

लातूर : खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच कांद्यावर निर्यातबंदी लादून शासनाने शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणले आहे, असा आरोप करीत बुधवार दि. २३ रोजी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले. यामध्ये निर्यातबंदी आदेशाची होळी करून रांगोळी घालण्यात आली.

गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र काही सोयाबीन कंपन्यांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक जणांना दुबार पेरणी करावी लागली. तर उडीद, मूग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. मागील आठवड्यातील मुसळधार पावसामुळे सोयाबीनही वाहून गेले.

या नुकसानीचे साधे पंचनामेही प्रशासनाने केलेले नाही. त्यातच आता शासनाने कांदा निर्यातबंदी लादून अडचणीत मोठी भर टाकली आहे, असा आरोप करीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले.

आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे, माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, किशनराव शिंदे, अशोक भोसले, अ‍ॅड. संतोष शिंदे, करण भोसले, किशोर महाराज शिवणीकर, विठ्ठल संपत्ते, बालाजी महाके, वसंत कंदगुळे, अण्णाराव चव्हाण, हरिश्चंद्र सलगरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीonionकांदा