शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वयंपाक, पिण्यासाठी 'हे' कुटुंब बारमाही वापरते पावसाचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:55 IST

स्वयंपाक अन् पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचा बारमाही वापर 

ठळक मुद्देमुरुडच्या खंडेलवाल कुटुंबाचा राजस्थानी पॅटर्न घराचे बांधकाम करतानाच पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली.

- नरसिंह कद्रे 

मुरुड (जि. लातूर) : एकीकडे उन्हाळ्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना  लातूर तालुक्यातील मुरुड येथे गेल्या २० वर्षांपासून काशीराम खंडेलवाल यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा बारमाही वापर केला आहे. विशेष म्हणजे हे पावसाचे पाणी स्वयंपाक व पिण्यासाठीही ते वापरतात. त्यांचा हा अनोखा प्रयोग मुरुड व परिसरात चर्चेत आहे. 

मुळचे राजस्थानमधील नागोर जिल्ह्याचे रहिवासी असलेले काशिराम खंडेलवाल हे कापड व्यवसायासाठी मुरुडला आले. २० वर्षांपूर्वी मुरुडला आलेल्या खंडेलवाल यांनी दैनंदिन वापरासाठी पावसाच्या पाण्याचा वापर सुरू केला. १४ वर्षांनंतर आजही कायम आहे. घराचे बांधकाम करतानाच त्यांनी पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली. त्यानुसार ५ फूट उंच, १४ फूट लांब व १० फूट खोलीचा हौद बांधला. तोही भूमिगत. या हौदात छतावर पडणारे पाणी दोन चेंबरमधून सोडले जाते. पाण्यातील कचरा हौदात जाऊ नये, यासाठी या दोन्ही चेंबरला जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा पडणाऱ्या दोन पावसाचे पाणी ते हौदात घेत नाहीत. परंतु, त्यानंतर पावसाचे पाणी हौदात घेतले जाते. एकदा हौद भरल्यानंतर त्यातील पाणी त्यांना २५ महिने पाणी पुरते.

सहा माणसांचे कुटुंबया हौदातून पाणी काढण्यासाठी खंडेलवाल यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेल्या बकेट व दोरीचा आजही उपयोग केला जातो. सहा माणसांचे कुटुंब असलेल्या खंडेलवाल यांना स्वयंपाक व पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचाच आधार आहे. 

प्रवासात घरातून घेतले जाते पाणीखंडेलवाल प्रवासाला निघाले तर प्रवासाच्या वेळेनुसार लागणारे पाणी बाटलीत भरून घेतात. त्यामुळे बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग कधी येत नाही. दर दोन वर्षांनी हौदाची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे पाण्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून आल्याने त्यांना पाणी बचतीचे फायदे चांगले माहीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ