शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वयंपाक, पिण्यासाठी 'हे' कुटुंब बारमाही वापरते पावसाचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:55 IST

स्वयंपाक अन् पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचा बारमाही वापर 

ठळक मुद्देमुरुडच्या खंडेलवाल कुटुंबाचा राजस्थानी पॅटर्न घराचे बांधकाम करतानाच पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली.

- नरसिंह कद्रे 

मुरुड (जि. लातूर) : एकीकडे उन्हाळ्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना  लातूर तालुक्यातील मुरुड येथे गेल्या २० वर्षांपासून काशीराम खंडेलवाल यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा बारमाही वापर केला आहे. विशेष म्हणजे हे पावसाचे पाणी स्वयंपाक व पिण्यासाठीही ते वापरतात. त्यांचा हा अनोखा प्रयोग मुरुड व परिसरात चर्चेत आहे. 

मुळचे राजस्थानमधील नागोर जिल्ह्याचे रहिवासी असलेले काशिराम खंडेलवाल हे कापड व्यवसायासाठी मुरुडला आले. २० वर्षांपूर्वी मुरुडला आलेल्या खंडेलवाल यांनी दैनंदिन वापरासाठी पावसाच्या पाण्याचा वापर सुरू केला. १४ वर्षांनंतर आजही कायम आहे. घराचे बांधकाम करतानाच त्यांनी पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली. त्यानुसार ५ फूट उंच, १४ फूट लांब व १० फूट खोलीचा हौद बांधला. तोही भूमिगत. या हौदात छतावर पडणारे पाणी दोन चेंबरमधून सोडले जाते. पाण्यातील कचरा हौदात जाऊ नये, यासाठी या दोन्ही चेंबरला जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा पडणाऱ्या दोन पावसाचे पाणी ते हौदात घेत नाहीत. परंतु, त्यानंतर पावसाचे पाणी हौदात घेतले जाते. एकदा हौद भरल्यानंतर त्यातील पाणी त्यांना २५ महिने पाणी पुरते.

सहा माणसांचे कुटुंबया हौदातून पाणी काढण्यासाठी खंडेलवाल यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेल्या बकेट व दोरीचा आजही उपयोग केला जातो. सहा माणसांचे कुटुंब असलेल्या खंडेलवाल यांना स्वयंपाक व पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचाच आधार आहे. 

प्रवासात घरातून घेतले जाते पाणीखंडेलवाल प्रवासाला निघाले तर प्रवासाच्या वेळेनुसार लागणारे पाणी बाटलीत भरून घेतात. त्यामुळे बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग कधी येत नाही. दर दोन वर्षांनी हौदाची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे पाण्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून आल्याने त्यांना पाणी बचतीचे फायदे चांगले माहीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ