शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

By हरी मोकाशे | Updated: July 1, 2024 18:47 IST

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट

लातूर : मृग बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय, पाणीटंचाईची दाहकता कमी झाली. मात्र, अद्यापही १४ टँकर आणि ४४५ अधिग्रहणे सुरुच होती. दरम्यान, पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने सोमवारपासून टँकर जागेवच थांबले आहेत तर अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांतील नागरिकांना कडेवर घागर घेऊन फिरावे लागत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. ती दूर करण्यासाठी जानेवारीअखेरपासून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला. यंदा तापमान वाढल्याने होरपळ होत होती. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात रोहिण्या आणि सुरुवातीस मृग बरसल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात टंचाई निवारणासाठीचे १४ टँकर बंद करण्यात आले. त्याबरोबर ९३ अधिग्रहणे बंद झाली.

टंचाई निवारणासाठी जूनअखेरपर्यंत मुदत...जिल्हा परिषदेच्या लघु व पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही आराखडा तयार करुन मंजुरी घेतली होती. ३० जूनपर्यंत ३२१ गावांना ४४५ अधिग्रहणाद्वारे आणि १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. मात्र, १ जुलै रोजी मुदत संपल्याने अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत.

अहमदपुरात सर्वाधिक सुरु होती अधिग्रहणे...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ०१रेणापूर - ५०उदगीर - २९अहमदपूर - ९६चाकूर - ४०देवणी - ०९जळकोट - २१निलंगा - ५९शिरुर अनं. - १६एकूण - ३२१

टँकरच्या पाण्यावर ४० हजार नागरिक...जिल्ह्यात रविवारपर्यंत १४ टँकर सुरु होते. त्यात टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, किनगाव, चाटेवाडी/ हंगेवाडी, सिरसाटवाडी/ मोळवणवाडी/ सोनवणेवाडी, अजनीवाडी, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा/ अतनूर तांडा, उमरगा रेतू, महापूर तांडा, मोहगाव, डोंगरशेळकी, महादेववाडी, बामाजीचीवाडी/ जायबाचीवाडी येथील ३९ हजार २४१ नागरिकांची तहान टँकर होती.

प्रस्ताव आल्यास शासनाकडे मागणी...जूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरले आहे. त्यानुसार पाहणी करुन काही ठिकाणची अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरची मुदत ३० जून रोजी संपल्यामुळे १ जुलैपासून अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांनी अधिग्रहण, टँकरचा प्रस्ताव सादर केल्यास तो शासनाकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर