शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

By हरी मोकाशे | Updated: July 1, 2024 18:47 IST

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट

लातूर : मृग बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय, पाणीटंचाईची दाहकता कमी झाली. मात्र, अद्यापही १४ टँकर आणि ४४५ अधिग्रहणे सुरुच होती. दरम्यान, पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने सोमवारपासून टँकर जागेवच थांबले आहेत तर अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांतील नागरिकांना कडेवर घागर घेऊन फिरावे लागत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. ती दूर करण्यासाठी जानेवारीअखेरपासून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला. यंदा तापमान वाढल्याने होरपळ होत होती. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात रोहिण्या आणि सुरुवातीस मृग बरसल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात टंचाई निवारणासाठीचे १४ टँकर बंद करण्यात आले. त्याबरोबर ९३ अधिग्रहणे बंद झाली.

टंचाई निवारणासाठी जूनअखेरपर्यंत मुदत...जिल्हा परिषदेच्या लघु व पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही आराखडा तयार करुन मंजुरी घेतली होती. ३० जूनपर्यंत ३२१ गावांना ४४५ अधिग्रहणाद्वारे आणि १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. मात्र, १ जुलै रोजी मुदत संपल्याने अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत.

अहमदपुरात सर्वाधिक सुरु होती अधिग्रहणे...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ०१रेणापूर - ५०उदगीर - २९अहमदपूर - ९६चाकूर - ४०देवणी - ०९जळकोट - २१निलंगा - ५९शिरुर अनं. - १६एकूण - ३२१

टँकरच्या पाण्यावर ४० हजार नागरिक...जिल्ह्यात रविवारपर्यंत १४ टँकर सुरु होते. त्यात टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, किनगाव, चाटेवाडी/ हंगेवाडी, सिरसाटवाडी/ मोळवणवाडी/ सोनवणेवाडी, अजनीवाडी, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा/ अतनूर तांडा, उमरगा रेतू, महापूर तांडा, मोहगाव, डोंगरशेळकी, महादेववाडी, बामाजीचीवाडी/ जायबाचीवाडी येथील ३९ हजार २४१ नागरिकांची तहान टँकर होती.

प्रस्ताव आल्यास शासनाकडे मागणी...जूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरले आहे. त्यानुसार पाहणी करुन काही ठिकाणची अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरची मुदत ३० जून रोजी संपल्यामुळे १ जुलैपासून अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांनी अधिग्रहण, टँकरचा प्रस्ताव सादर केल्यास तो शासनाकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर