शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

By हरी मोकाशे | Updated: July 1, 2024 18:47 IST

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट

लातूर : मृग बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय, पाणीटंचाईची दाहकता कमी झाली. मात्र, अद्यापही १४ टँकर आणि ४४५ अधिग्रहणे सुरुच होती. दरम्यान, पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने सोमवारपासून टँकर जागेवच थांबले आहेत तर अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ३२१ गावांतील नागरिकांना कडेवर घागर घेऊन फिरावे लागत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. ती दूर करण्यासाठी जानेवारीअखेरपासून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला. यंदा तापमान वाढल्याने होरपळ होत होती. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात रोहिण्या आणि सुरुवातीस मृग बरसल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात टंचाई निवारणासाठीचे १४ टँकर बंद करण्यात आले. त्याबरोबर ९३ अधिग्रहणे बंद झाली.

टंचाई निवारणासाठी जूनअखेरपर्यंत मुदत...जिल्हा परिषदेच्या लघु व पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही आराखडा तयार करुन मंजुरी घेतली होती. ३० जूनपर्यंत ३२१ गावांना ४४५ अधिग्रहणाद्वारे आणि १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. मात्र, १ जुलै रोजी मुदत संपल्याने अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत.

अहमदपुरात सर्वाधिक सुरु होती अधिग्रहणे...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ०१रेणापूर - ५०उदगीर - २९अहमदपूर - ९६चाकूर - ४०देवणी - ०९जळकोट - २१निलंगा - ५९शिरुर अनं. - १६एकूण - ३२१

टँकरच्या पाण्यावर ४० हजार नागरिक...जिल्ह्यात रविवारपर्यंत १४ टँकर सुरु होते. त्यात टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, किनगाव, चाटेवाडी/ हंगेवाडी, सिरसाटवाडी/ मोळवणवाडी/ सोनवणेवाडी, अजनीवाडी, शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा/ अतनूर तांडा, उमरगा रेतू, महापूर तांडा, मोहगाव, डोंगरशेळकी, महादेववाडी, बामाजीचीवाडी/ जायबाचीवाडी येथील ३९ हजार २४१ नागरिकांची तहान टँकर होती.

प्रस्ताव आल्यास शासनाकडे मागणी...जूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरले आहे. त्यानुसार पाहणी करुन काही ठिकाणची अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरची मुदत ३० जून रोजी संपल्यामुळे १ जुलैपासून अधिग्रहणे, टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांनी अधिग्रहण, टँकरचा प्रस्ताव सादर केल्यास तो शासनाकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर