शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:38 IST

दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़

ठळक मुद्दे दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न

- हरी मोकाशे

लातूर : हिवाळा मध्यावर आला की दावतपूर गावात पाण्याचा यक्षप्रश्न उभा राहत असे़ पाणी उपलब्ध नसल्याने रबी हंगामाच्या उत्पन्नावर बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच सोडावे लागत असे़ दरवर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनीच चंग बांधला आणि दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़ ही यशकथा आहे दावतपूर (ता़ औसा) गावची़

औसा तालुक्यातील दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले़ परंतु, गावानजीक कुठलाही प्रकल्प नसल्याने गावकऱ्यांची पाण्याची मदार सार्वजनिक विहीर आणि एका बोअरवर आहे़ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत असून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ डिसेंबर महिना उजाडला की, गावास पाणीटंचाईच्या झळा बसत असत़ उन्हाळ्यात तर रानोमाळ भटकंती करावी लागत असे़

गावच डोंगराळ भागात असल्याने खरीप हंगाम वगळला तर ८० टक्के शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येत नसे़ त्यामुळे गावातील नागरिक रोजगाराच्या शोधात फिरत असत़ या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी मन परिवर्तन केले़  

लोकसहभागातून नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा करण्यात आला़ मग्रारोहयोअंतर्गत शोषखड्डे खोदण्यात आले़ परिणामी, गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे रबीची पिकेही शेतकऱ्यांना घेता येऊ लागली आहेत़ यासाठी शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकचा वापर करीत असल्याचे ग्रामसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले़

नेमके काय केले?पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभाग घेऊन श्रमदानातून मातीनाला, कंपार्टमेंट बल्डिंगची जवळपास ११ ते १२ लाखांची कामे करण्यात आली़ तसेच जलयुक्त शिवारअंतर्गत ८० ते ८५ क्युबिक मीटर, पाच किमी नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली़ गावात ३०० जलशोषक खड्डे, १३ सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, २२ शेततळी, सात हजार मीटर समतल चर, १८७५ घनमीटर समतल सखोल चर, प्रत्येक घरासमोर शोषखड्डे व परिसरातील तीन तलावांची दुरुस्ती करण्यात आली़ त्यानंतर पर्जन्यमान चांगले झाले आणि गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे आजघडीला ८० टक्के शेतकरी रबीचीही पिके घेऊ लागली आहेत़

बदल काय झाला?दावतपूर गावास उन्हाळ्यात अधिग्रहण तर काही वेळेस टँकरने पाणीपुरवठा होत असे़ परंतु, यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६४ टक्के पर्जन्यमान झाले असतानाही गावात पुरेसा जलसाठा आहे़ गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे गाव पाणीदार झाले आहे़ 

जुन्या गावात तळे घेण्याचा ठराव पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविली आहे़ जुन्या गावात तळे घेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला असल्याचे सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी सांगितले़

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीlaturलातूर