शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:38 IST

दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़

ठळक मुद्दे दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न

- हरी मोकाशे

लातूर : हिवाळा मध्यावर आला की दावतपूर गावात पाण्याचा यक्षप्रश्न उभा राहत असे़ पाणी उपलब्ध नसल्याने रबी हंगामाच्या उत्पन्नावर बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच सोडावे लागत असे़ दरवर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनीच चंग बांधला आणि दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़ ही यशकथा आहे दावतपूर (ता़ औसा) गावची़

औसा तालुक्यातील दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले़ परंतु, गावानजीक कुठलाही प्रकल्प नसल्याने गावकऱ्यांची पाण्याची मदार सार्वजनिक विहीर आणि एका बोअरवर आहे़ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत असून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ डिसेंबर महिना उजाडला की, गावास पाणीटंचाईच्या झळा बसत असत़ उन्हाळ्यात तर रानोमाळ भटकंती करावी लागत असे़

गावच डोंगराळ भागात असल्याने खरीप हंगाम वगळला तर ८० टक्के शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येत नसे़ त्यामुळे गावातील नागरिक रोजगाराच्या शोधात फिरत असत़ या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी मन परिवर्तन केले़  

लोकसहभागातून नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा करण्यात आला़ मग्रारोहयोअंतर्गत शोषखड्डे खोदण्यात आले़ परिणामी, गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे रबीची पिकेही शेतकऱ्यांना घेता येऊ लागली आहेत़ यासाठी शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकचा वापर करीत असल्याचे ग्रामसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले़

नेमके काय केले?पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभाग घेऊन श्रमदानातून मातीनाला, कंपार्टमेंट बल्डिंगची जवळपास ११ ते १२ लाखांची कामे करण्यात आली़ तसेच जलयुक्त शिवारअंतर्गत ८० ते ८५ क्युबिक मीटर, पाच किमी नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली़ गावात ३०० जलशोषक खड्डे, १३ सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, २२ शेततळी, सात हजार मीटर समतल चर, १८७५ घनमीटर समतल सखोल चर, प्रत्येक घरासमोर शोषखड्डे व परिसरातील तीन तलावांची दुरुस्ती करण्यात आली़ त्यानंतर पर्जन्यमान चांगले झाले आणि गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे आजघडीला ८० टक्के शेतकरी रबीचीही पिके घेऊ लागली आहेत़

बदल काय झाला?दावतपूर गावास उन्हाळ्यात अधिग्रहण तर काही वेळेस टँकरने पाणीपुरवठा होत असे़ परंतु, यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६४ टक्के पर्जन्यमान झाले असतानाही गावात पुरेसा जलसाठा आहे़ गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे गाव पाणीदार झाले आहे़ 

जुन्या गावात तळे घेण्याचा ठराव पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविली आहे़ जुन्या गावात तळे घेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला असल्याचे सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी सांगितले़

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीlaturलातूर