शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:38 IST

दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़

ठळक मुद्दे दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न

- हरी मोकाशे

लातूर : हिवाळा मध्यावर आला की दावतपूर गावात पाण्याचा यक्षप्रश्न उभा राहत असे़ पाणी उपलब्ध नसल्याने रबी हंगामाच्या उत्पन्नावर बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच सोडावे लागत असे़ दरवर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनीच चंग बांधला आणि दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़ ही यशकथा आहे दावतपूर (ता़ औसा) गावची़

औसा तालुक्यातील दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले़ परंतु, गावानजीक कुठलाही प्रकल्प नसल्याने गावकऱ्यांची पाण्याची मदार सार्वजनिक विहीर आणि एका बोअरवर आहे़ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत असून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ डिसेंबर महिना उजाडला की, गावास पाणीटंचाईच्या झळा बसत असत़ उन्हाळ्यात तर रानोमाळ भटकंती करावी लागत असे़

गावच डोंगराळ भागात असल्याने खरीप हंगाम वगळला तर ८० टक्के शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येत नसे़ त्यामुळे गावातील नागरिक रोजगाराच्या शोधात फिरत असत़ या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी मन परिवर्तन केले़  

लोकसहभागातून नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा करण्यात आला़ मग्रारोहयोअंतर्गत शोषखड्डे खोदण्यात आले़ परिणामी, गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे रबीची पिकेही शेतकऱ्यांना घेता येऊ लागली आहेत़ यासाठी शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकचा वापर करीत असल्याचे ग्रामसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले़

नेमके काय केले?पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभाग घेऊन श्रमदानातून मातीनाला, कंपार्टमेंट बल्डिंगची जवळपास ११ ते १२ लाखांची कामे करण्यात आली़ तसेच जलयुक्त शिवारअंतर्गत ८० ते ८५ क्युबिक मीटर, पाच किमी नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली़ गावात ३०० जलशोषक खड्डे, १३ सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, २२ शेततळी, सात हजार मीटर समतल चर, १८७५ घनमीटर समतल सखोल चर, प्रत्येक घरासमोर शोषखड्डे व परिसरातील तीन तलावांची दुरुस्ती करण्यात आली़ त्यानंतर पर्जन्यमान चांगले झाले आणि गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे आजघडीला ८० टक्के शेतकरी रबीचीही पिके घेऊ लागली आहेत़

बदल काय झाला?दावतपूर गावास उन्हाळ्यात अधिग्रहण तर काही वेळेस टँकरने पाणीपुरवठा होत असे़ परंतु, यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६४ टक्के पर्जन्यमान झाले असतानाही गावात पुरेसा जलसाठा आहे़ गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे गाव पाणीदार झाले आहे़ 

जुन्या गावात तळे घेण्याचा ठराव पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविली आहे़ जुन्या गावात तळे घेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला असल्याचे सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी सांगितले़

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीlaturलातूर