लातुरमध्ये महानगरपालिकेची धडक मोहीम, अतिक्रमणावर हातोडा!
By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2022 17:44 IST2022-09-21T17:43:47+5:302022-09-21T17:44:53+5:30
रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमण हटविले

लातुरमध्ये महानगरपालिकेची धडक मोहीम, अतिक्रमणावर हातोडा!
लातूर : शहरातील विविध मार्गावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने हातोडा घेतला आहे. गेल्या पाच-सहा दिवसापासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गेल्या पाच-सहा दिवसांपासून लातूर शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. बुधवारी जुना रेणापूर नाका ते नवीन रेणापूर नाका दरम्यान करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. ही मोहीम महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सकाळी ९ वाजल्यापासून सुरु करण्यात आली.
लातुरात सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे.