शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डेंग्यूच्या तापीमुळे शरीरातील पेशींची संख्या होते कमी; लहान मुलांची काळजी घ्या - डॉ. वर्धमान उदगीरकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 2:45 PM

सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. 

लातूर : सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूचा ताप वाढला आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. वर्धमान उदगीरकर म्हणाले, डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून तो एडिस जातीच्या डासांमुळे होतो. त्यास हड्डीतोड तापही म्हटले जाते. एडिस डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्दांना डेंग्यूचा सर्वात अगोदर आजार होण्याची भीती असते.डेंग्यू आजाराचे दोन प्रकार असून पहिला प्रकारात ताप येणे तर दुसऱ्या प्रकार हा गुंतागुंतीचा आहे. गुंतागुंतीच्या प्रकारात यकृत, किडनी, मेंदू या अवयवांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शरीरावर सूज, पोटात आणि छातीत पाणी भरण्याची भीती असते. डेंग्यूची गुंतागुंत वाढल्यास प्लेटलेट कमी- कमी होतात. प्रत्येकात साधारणपणे दीड लाख ते साडेचार लाखापर्यंत प्लेटलेट असतात. परंतु, डेंग्युमुळे त्या ५ ते १० हजारापर्यंत खाली येऊ शकतात. डेंग्यूच्या निदानासाठी एनएस-१ अ‍ॅन्टीझीन तसेच आयजीएमआयजीजी या तपासण्या केल्या जातात.

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणे...अंगात तापी भरतो. तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, स्रायूदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळे दुखणे असे त्रास जाणवतात तर डेंग्यूमधील गुंतागुंतीमध्ये कातडीवर पुरळ येणे, चट्टे पडणे, हिरड्या-नाकातून रक्त येणे, डोळ्यांत रक्त उतरणे, लघुशंका आणि उलटीतून रक्त येते.

आजारात पपई फायदेशीर...डेंग्यू आजार झालेल्यास पपई, पपईच्या पानांचा ज्यूस, अर्क असलेली औषधे उपचारासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे पपईवर भर द्यावा. तसेच रुग्णांनी विश्रांती घ्यावी. व्यवस्थित व पूरक पाणी प्यावे. अंगात ताप भरल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूमुळे बहुतांश वेळा प्लेटलेटची आवश्यकता असते. त्यामुळे डॉक्टर प्लेटलेट चढवितात. 

असा करा प्रतिबंध...डेंग्यू आजार होऊन नये म्हणून नाल्या, गटारी साफ केल्या पाहिजे. घरातील कुंड्यांतील पाणी दररोज बदलले पाहिजे. डबक्यात पाणी साठू देऊ नये. घर परिसरात पडलेल्या टायरामध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, पाणी साठविण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावीत. रिकामी पिंपे व पाण्याची भांडी पालथी करुन ठेवावीत. कारण थोड्याशाही साचलेल्या पाण्यात एडीस डासांची वाढ होऊ शकते. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

ही घ्या काळजी...डेंग्यूचा आजार होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी, प्रवासात लांब बाह्याचे कपडे वापरावेत. मुलांना अंगभर कपडे घालावेत. तसेच घरात मॅट, क्वाईल, लिक्विड अशी डास प्रतिबंधात्मक साधने वापरावीत. मच्छरदाणी वापर करावा. घरांना जाळ्या बसवाव्यात.

रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी...डेंग्यूमधील गुंतागुंत समजण्यासाठी रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी. कारण सामान्यपणे डेंग्यू ताप हा फ्लूसारखा वाटत असला तरी कधी- कधी तो गंभीर आजार बनू शकतो. डेंग्यूविरुध्द अजूनही कोणतीही लस उपलब्ध नाही. डेंग्यूचा आजार झाल्यानंतर बहुतांश नातेवाईक रुग्णाच्या शरीरातील पेशी वाढत नसल्याने ते संभ्रमित होऊन घाबरतात. परंतु, घाबरु नये. औषधोपचार आणि रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीनुसार कमी झालेल्या पेशी हळूहळू वाढतात. त्यामुळे औषधोपचार सुरुच ठेवावे, असे डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर