शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

लातूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 18:58 IST

बाजारगप्पा : चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

- हरी मोकाशे ( लातूर )

शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून राशी करण्यास सुरुवात केल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज नव्या तुरीची जवळपास २५० क्विंटल आवक होण्यास सुरुवात झाली आहे; परंतु बाजारपेठेत मिळणारा दर हा हमीभावापेक्षा कमी असून, तो ४५६० रुपये प्रति क्विंटल आहे़ परिणामी, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे १ हजार ४० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

खरिपातील तूर काढणी व राशीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे़ यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे तुरीच्या शेंगांमध्ये अपेक्षित बी भरणा झाला नाही़ बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीचा तर खराटाच झाला़ जे शेतकरी राशी करीत आहेत, त्यांच्या तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दरम्यान, शासनाने तुरीस ५ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केल्याने आणि गत महिन्यात तूर डाळीच्या दरात वाढ झाल्याने यंदा तुरीला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाची आवक घटल्याने बाजार समितीतील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे़ गत आठवड्यापासून सोयाबीनला मिळणारा दर कमी झाला आहे़ सध्या सर्वसाधारण दर ३२८० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे़ बाजारपेठेत दररोज सोयाबीनची आवक १७ हजार १२५ क्विंटल होत असून ती स्थिर आहे; परंतु कमाल दरही घसरला असून, तो ३ हजार ३५८ रुपये असा आहे़ नव्या तुरीमुळे आवक वाढली असून ती ४ हजार ७७ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे़ कमाल दर ४८५० रुपये, सर्वसाधारण दर ४५६०, तर किमान भाव ४३०१ रुपये मिळत आहे. 

बाजारपेठेत मुगाची आवक घटली असून २६५ क्विंटल होत आहे़ सर्वसाधारण दर ५२०० रुपये मिळत असून, गत आठवड्याच्या तुलेनत सध्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या रबीतील हरभऱ्याची आवक ९७३ क्विंटल होत आहे़  हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांनी घट झाली असून, सर्वसाधारण दर ४ हजार ५० रुपयांवर पोहोचला आहे़ बाजरीस सर्वसाधारण दर १९००, गहू- २४००, हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २४५०, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १६००, उडीद- ४५००, करडई- ४२००, सोयाबीन- ३२८०, तीळ- १२०००, गूळ- २५१५, धने- ४३०० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ हिरवा चारा व कडब्याच्या दरात वाढ झाली असून, ४५ रुपयांना एक पेंढी अशा दराने विक्री होत आहे़

वास्तविक पाहता, तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शासनाने नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे ठरत असतानाही अद्यापही हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ हे केंद्र चालविण्यासाठी खाजगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यातच प्रशासन मश्गुल असल्याचे दिसून येत आहे़ यंदा उडीद, मूग खरेदीसाठीही वेळेवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत आपला शेतमाल खुल्या बाजारपेठेत मिळेल त्या दराने विक्री करावा लागला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी