शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

शेती पिकांचे नुकसान; नदीवरील पुलावरून पावसाचे पाणी, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 08:46 IST

वाहतूक ठप्प : शेती पिकांना बसला फटका

किनगाव (जि. लातूर) : किनगावसह परिसरात शुक्रवार दुपारी जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेत- शिवारातून पाणीच पाणी वाहत होते. दरम्यान, खानापूर नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने किनगाव- लातूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

किनगावहून लातूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग हा कारेपूर मार्गे आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. किनगावजवळील खानापूर नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. शुक्रवारी दुपारी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत असल्याचे पहावयास मिळाले. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी या भागातील नागरिक, वाहनधारकांकडून सातत्याने मागणी होत आहे.

यापूर्वीही झाली होती वाहतूक ठप्प...

यापूर्वीही ९ जुलै रोजी मोठा पाऊस झाल्याने चार ते पाच तास पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा पूल जुना असून पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरून कमी प्रमाणात पाणी वाहताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, छोटे- मोठे अपघात घडत आहेत. पुलाची उंची वाढवून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी