शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शेती पिकांचे नुकसान; नदीवरील पुलावरून पावसाचे पाणी, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 08:46 IST

वाहतूक ठप्प : शेती पिकांना बसला फटका

किनगाव (जि. लातूर) : किनगावसह परिसरात शुक्रवार दुपारी जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेत- शिवारातून पाणीच पाणी वाहत होते. दरम्यान, खानापूर नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने किनगाव- लातूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

किनगावहून लातूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग हा कारेपूर मार्गे आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. किनगावजवळील खानापूर नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. शुक्रवारी दुपारी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत असल्याचे पहावयास मिळाले. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी या भागातील नागरिक, वाहनधारकांकडून सातत्याने मागणी होत आहे.

यापूर्वीही झाली होती वाहतूक ठप्प...

यापूर्वीही ९ जुलै रोजी मोठा पाऊस झाल्याने चार ते पाच तास पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा पूल जुना असून पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरून कमी प्रमाणात पाणी वाहताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, छोटे- मोठे अपघात घडत आहेत. पुलाची उंची वाढवून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी