पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:16+5:302021-09-09T04:25:16+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या ...

पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखिमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी ॲप डाऊऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी. टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, भारतीय कृषी विमा कंपनी यांचेकडे अर्ज सादर करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर यांनी केले आहे.