शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणासाठी मनपा सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

लातूर : महानगरपालिका आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शहरात कॅच द रेन अभियान राबविण्यात येत असून, छतावरील ...

लातूर : महानगरपालिका आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शहरात कॅच द रेन अभियान राबविण्यात येत असून, छतावरील पाण्याचे संकलन आणि पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी दहा सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. लातूर शहरामध्ये २०१५-१६मध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की लातूर शहरावर ओढवली होती. लातूर शहर हे अवर्षण भागात असल्यामुळे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम मनपाने हाती घेतला आहे. शहरातील इमारतींवरील पावसाचा प्रत्येक थेंब भूजलात रुपांतर करण्याकरिता संकलन करून बोअर, शोष खड्ड्यांमध्ये पुनर्भरण केले जाणार आहे. हे अभियान १ जुलैपासून राबविले जाणार आहे. पुनर्भरण हे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी १० संस्थांची तांत्रिक मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाही मदतीला आहे. पुनर्भरण कार्यक्रम अत्यंत कमी खर्चाचा असून, छताच्या प्रमाणकाचा विचार केल्यास १५ ते २० रुपये प्रति चौरस फूट एवढा खर्च येतो. त्यासाठी महानगरपालिकेने जनजागृती सुरू केली आहे.

शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या दुमजली इमारती आहेत, सोसायटी आहेत, त्या सर्व इमारती, सोसायटीच्या छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसची पोहोच संबंधित मालमत्ताधारकांकडून घेतली असून, सोसायटीचे नाव, अध्यक्ष, सचिवाचे नाव, दूरध्वनी क्रमांक याबाबतचा सर्व अहवाल संकलित करण्याचे काम सुरू आहे. २८ जूनपर्यंत अहवाल आल्यानंतर १ जुलैपासून प्रत्यक्ष पुनर्भरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिली.

मालमत्ता करात ५ टक्के सूट

ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या छतावरचे पाणी संकलित करून पुनर्भरण केले आहे, त्या मालमत्ताधारकांना मालमत्ता करात ५ टक्के सूट दिली जाणार आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. - अमन मित्तल, मनपा आयुक्त

तर बांधकाम परवाना रद्द

छतावरील पाण्याचे भूजल पुनर्भरण करून सचित्र अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. पुनर्भरण न केल्यास संबंधित इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करण्यात येणार आहे. शिवाय, दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. हे अभियान १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगानेही मनपा आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.