शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बाळासाहेबांचं नागरिकत्त्व रद्द करणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं - नरेंद्र मोदींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:22 IST

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला

औसा - काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला. लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरविण्यात आली होती. यावर पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत तेच पाकिस्तानला हवं आहे. जम्मू काश्मीरमधून सैन्यांचा अधिकार काढून टाकणार तेच पाकिस्तानला हवं आहे. पाकिस्तानला जे जे हवं तेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. जे देशाच्या विरोधात बोलतील त्यांच्याविरोधात असणारं देशद्रोहाचं कलमही काँग्रेस रद्द करण्याचं आश्वासन देते. पाकिस्तानला पुरक भूमिका घेण्याचं काम काँग्रेसकडून होते. दहशतवाद्यांशी मानवता दाखविणाऱ्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली.

तसेच घराणेशाहीवर टीका करतानाही बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बाळासाहेबांना वाटलं असतं तर बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, जर बाळासाहेबांना वाटलं असतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र बाळासाहेबांनी लोकांसाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांनी घराणेशाहीचा मार्ग अवलंबला नाही असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

...म्हणून बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढला होता द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदान करणे आणि निवडणूक लढवणे यावर बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 मध्ये बाळासाहेबांवर 6 वर्षासाठी मतदान करण्यावर बंदी आणली होती. यानंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेVotingमतदानlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019