शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

बाळासाहेबांचं नागरिकत्त्व रद्द करणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं - नरेंद्र मोदींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:22 IST

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला

औसा - काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला. लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरविण्यात आली होती. यावर पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत तेच पाकिस्तानला हवं आहे. जम्मू काश्मीरमधून सैन्यांचा अधिकार काढून टाकणार तेच पाकिस्तानला हवं आहे. पाकिस्तानला जे जे हवं तेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. जे देशाच्या विरोधात बोलतील त्यांच्याविरोधात असणारं देशद्रोहाचं कलमही काँग्रेस रद्द करण्याचं आश्वासन देते. पाकिस्तानला पुरक भूमिका घेण्याचं काम काँग्रेसकडून होते. दहशतवाद्यांशी मानवता दाखविणाऱ्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली.

तसेच घराणेशाहीवर टीका करतानाही बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बाळासाहेबांना वाटलं असतं तर बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, जर बाळासाहेबांना वाटलं असतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र बाळासाहेबांनी लोकांसाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांनी घराणेशाहीचा मार्ग अवलंबला नाही असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

...म्हणून बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढला होता द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदान करणे आणि निवडणूक लढवणे यावर बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 मध्ये बाळासाहेबांवर 6 वर्षासाठी मतदान करण्यावर बंदी आणली होती. यानंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेVotingमतदानlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019