शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसच्या नेत्यांकडे नोटांचे बंडल सापडत आहेत - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:51 IST

चौकीदार चोर आहे, असे गेल्या सहा महिन्यांपासून ते बोलत आहेत. मात्र नोटांचे बंडल त्यांच्याच नेत्यांच्या घरातच सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच चोर असून त्यांना आता चौकीदाराची भीती वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.  

लातूर : शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर विभागाने ठिकठिकांनी टाकलेल्या छापेमारीचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. चौकीदार चोर आहे, असे गेल्या सहा महिन्यांपासून ते बोलत आहेत. मात्र नोटांचे बंडल त्यांच्याच नेत्यांच्या घरातच सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच चोर असून त्यांना आता चौकीदाराची भीती वाटत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.  

देशातून दहशतवाद नष्ट करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. काँग्रेसने आपल्या फायद्यासाठी त्यांना मोकळीक दिली, मात्र असे आता होणार नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून आम्ही मारणार, ही नव्या भारताची नीती आहे, असे मोदी नरेंद्र म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवाद्यांच्या मनात सकारात्मकता जागविली आहे. आता तिथे दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. 

काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधून  370 हटवण्याची भाषा ढकोसलापत्रात (जाहीरनाम्यात) केली आहे, तिच भाषा पाकिस्तान करत आहे.  काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करु शकता का? असा सवालही नरेंद्र मोदींनी यावेळी केला. 

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नरेंद्र मोदींनी लक्ष केले. काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीत, पण शरदराव तुम्हीसुद्धा?... असा प्रश्न करत मोदींनी पवारांना इतरांपेक्षा वेगळे ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. राजकारण आपल्या जागी; परंतु, काश्मीर भारतापासून तोडू पाहणाऱ्यांसोबत, ज्यांना देशात दोन पंतप्रधान हवेत त्यांच्यासोबत शरदराव तुम्ही शोभून दिसत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ मतांसाठी आहे, पण आमचे संकल्पपत्र हे मतदारांसाठी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ 23 मे पर्यंत आहे, पण आमचे संकल्पपत्र हे पुढल्या काळातील विकासासाठी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरcongressकाँग्रेसBJPभाजपा