शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा फळझाडावर हल्ला, ६५० झाडांचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची ...

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची तर बाळाजी कोंडिबा गोदाजी यांनी ५० आंब्याच्या झाडाची लागवड केली होती. ९ महिन्यांपासून रोपांना खत, ठिंबकद्वारे पाणी देऊन आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जपले होते. शिवारातील ऊस कारखान्याला गेल्याने शिवार उघडे पडले असून, रानडुकरांना खाण्यासाठी काही उरलेच नाही. परिणामी, रानडुकरांच्या कळपाने आता हिरव्या रोपावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, दहा महिन्यांपासून रोपाची जोपासणा करून झाडे गुडघ्याला आली होती. विविध नमुन्याची फळाची झाडे लावून कायमस्वरूपी उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, झाडाला फळ लागण्याआधीच रानडुकरांनी झाडांची नासाडी करून रान काळेभोर केले आहे. रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक काेंडी...

शेतीत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. शेतीत कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी साडसहाशे विविध फळाची लाखो रुपयांचा खर्च करत झाडांची लागवड केली हाेती. मात्र, रानडुकरांच्या कळपाने शेतातील एकही झाड शिल्लक ठेवले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बदोबस्त करून, सदर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी दीप आंब्रे यांनी केली आहे.