शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

"भाजपने ३३ टक्के महिलांना उमेदवारी देऊन मनुस्मृतीप्रमाणे वागत नसल्याचे दाखवावे"

By हणमंत गायकवाड | Updated: October 2, 2023 18:40 IST

मनुस्मृतीप्रमाणे वागत नाही हे दाखवण्याची भाजपला संधी

लातूर : एक राष्ट्र, एक निवडणूक यासाठी भाजप-आरएसएसने देशांमध्ये गोंधळ घातला होता. त्याला कायदेशीर अडचणही नव्हती. मात्र अनेक राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव फसला आहे. विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षणाचे बिल पास करण्यात आले असले तरी २०३५ पर्यंत आरक्षण देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी देऊन आम्ही मनुस्मृतीप्रमाणे वागत नाहीत हे दाखवावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला केले आहे.

लातूर येथे सोमवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. यापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप, आरएसएस महिलांना समानतेची वागणूक देत नाही. वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनुस्मृतीचीच वागणूक महिलांना भाजपने दिली आहे. पक्षात त्यांनी कधीच महिलांना ३३ टक्के उमेदवारी दिलेली नाही. आता ते स्वतःहून बदलत असतील तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी द्यावी. महिला आरक्षण लागू होईल तेव्हा होईल. मात्र उमेदवारी देऊन आम्ही बदललो आहोत, हे सिद्ध करावे. शिवसेना ठाकरे गटासोबत युती तसेच आघाडीत सामील होण्याच्या अनुषंगाने ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकाही केली. पत्रपरिषदेला रेखाताई ठाकूर, संतोष सूर्यवंशी, सलीम सय्यद आदींची उपस्थिती होती.

हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न....दिवाळीनंतरचा काळ कठीण आहे. हिंदू, मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोध्रा आणि मणिपूर कांड पुन्हा घडणार नाही, यासाठी सामान्य जनतेने डोके भडकवू देऊ नये. हिंदू-मुस्लिम द्वेष भावना निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. दिवाळीनंतरचा काळ निवडणुकीचा आहे. त्यामुळे मुसलमानांना टार्गेट केले जाईल, तसे भाजपचे नियोजन सुरू असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.

देशाच्या सत्तांतराच्यावेळी अराजकतेचा माहोल....सत्ता पालट होईल की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण या सत्तांतराच्या वेळी देशांमध्ये अराजकतेचा माहोल असेल, असे भाकीत करत आंबेडकर म्हणाले, देशातील पाच मंदिरे निवडणूक काळापर्यंत मिलिटरीच्या ताब्यात द्यावेत, असे आपण म्हटले होते. या विधानाचा गैर अर्थ काढण्यात आला. दरम्यान, शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादाच्या नावाखाली अनेकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही एक प्रकारची अराजकता आहे.

मुस्लिम समाजाचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा....ईद-ए-मिलाद हा सण गणेश विसर्जनाच्या दिवशी होता. मात्र मुस्लिम समाजाने सामंजस्यपणा दाखवून हा सण गणेश विसर्जन असल्याने दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlaturलातूरBJPभाजपाlok sabhaलोकसभा