शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

"भाजपने ३३ टक्के महिलांना उमेदवारी देऊन मनुस्मृतीप्रमाणे वागत नसल्याचे दाखवावे"

By हणमंत गायकवाड | Updated: October 2, 2023 18:40 IST

मनुस्मृतीप्रमाणे वागत नाही हे दाखवण्याची भाजपला संधी

लातूर : एक राष्ट्र, एक निवडणूक यासाठी भाजप-आरएसएसने देशांमध्ये गोंधळ घातला होता. त्याला कायदेशीर अडचणही नव्हती. मात्र अनेक राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव फसला आहे. विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षणाचे बिल पास करण्यात आले असले तरी २०३५ पर्यंत आरक्षण देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी देऊन आम्ही मनुस्मृतीप्रमाणे वागत नाहीत हे दाखवावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला केले आहे.

लातूर येथे सोमवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. यापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप, आरएसएस महिलांना समानतेची वागणूक देत नाही. वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनुस्मृतीचीच वागणूक महिलांना भाजपने दिली आहे. पक्षात त्यांनी कधीच महिलांना ३३ टक्के उमेदवारी दिलेली नाही. आता ते स्वतःहून बदलत असतील तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी द्यावी. महिला आरक्षण लागू होईल तेव्हा होईल. मात्र उमेदवारी देऊन आम्ही बदललो आहोत, हे सिद्ध करावे. शिवसेना ठाकरे गटासोबत युती तसेच आघाडीत सामील होण्याच्या अनुषंगाने ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकाही केली. पत्रपरिषदेला रेखाताई ठाकूर, संतोष सूर्यवंशी, सलीम सय्यद आदींची उपस्थिती होती.

हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न....दिवाळीनंतरचा काळ कठीण आहे. हिंदू, मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोध्रा आणि मणिपूर कांड पुन्हा घडणार नाही, यासाठी सामान्य जनतेने डोके भडकवू देऊ नये. हिंदू-मुस्लिम द्वेष भावना निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. दिवाळीनंतरचा काळ निवडणुकीचा आहे. त्यामुळे मुसलमानांना टार्गेट केले जाईल, तसे भाजपचे नियोजन सुरू असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.

देशाच्या सत्तांतराच्यावेळी अराजकतेचा माहोल....सत्ता पालट होईल की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण या सत्तांतराच्या वेळी देशांमध्ये अराजकतेचा माहोल असेल, असे भाकीत करत आंबेडकर म्हणाले, देशातील पाच मंदिरे निवडणूक काळापर्यंत मिलिटरीच्या ताब्यात द्यावेत, असे आपण म्हटले होते. या विधानाचा गैर अर्थ काढण्यात आला. दरम्यान, शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादाच्या नावाखाली अनेकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही एक प्रकारची अराजकता आहे.

मुस्लिम समाजाचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा....ईद-ए-मिलाद हा सण गणेश विसर्जनाच्या दिवशी होता. मात्र मुस्लिम समाजाने सामंजस्यपणा दाखवून हा सण गणेश विसर्जन असल्याने दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlaturलातूरBJPभाजपाlok sabhaलोकसभा