शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:46 IST

६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार

लातूर : भारतीय जैन संघटनेने जूनअखेरपर्यंत राज्यातील बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाची कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविला जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली.मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. किल्लारीतील भूकंपानंतर तेथील १० हजार नागरिकांना दररोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महाराष्ट्र सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतजमीन सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या.२०१८ च्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जेसीबी मशीन भाड्याने घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनचा ८ लाख ५२ हजार तास वापर झाला. त्यामुळे ५ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढली. ३ मार्च २०१८ रोजी बुलडाणा येथे १३४ जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत ५० लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात दुष्काळ मुक्ती अभियानचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी किल्लारी येथे होईल.शासनाकडून डिझेल पुरवठालोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सेवाभावी संस्था, सीएसआर कंपन्यांच्या सहकार्यातून कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा करारही झाला आहे. भारतीय जैन संघटना जेसीबी, पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेवेल. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे मॉडेल तयार करून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन