शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:46 IST

६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार

लातूर : भारतीय जैन संघटनेने जूनअखेरपर्यंत राज्यातील बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाची कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविला जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली.मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. किल्लारीतील भूकंपानंतर तेथील १० हजार नागरिकांना दररोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महाराष्ट्र सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतजमीन सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या.२०१८ च्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जेसीबी मशीन भाड्याने घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनचा ८ लाख ५२ हजार तास वापर झाला. त्यामुळे ५ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढली. ३ मार्च २०१८ रोजी बुलडाणा येथे १३४ जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत ५० लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात दुष्काळ मुक्ती अभियानचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी किल्लारी येथे होईल.शासनाकडून डिझेल पुरवठालोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सेवाभावी संस्था, सीएसआर कंपन्यांच्या सहकार्यातून कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा करारही झाला आहे. भारतीय जैन संघटना जेसीबी, पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेवेल. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे मॉडेल तयार करून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन