शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत !

By हरी मोकाशे | Updated: June 5, 2023 18:20 IST

बीज प्रक्रियेवर भर : ६ लाख हेक्टरवर पेरा अपेक्षित

लातूर : खरीप हंगामासाठी खर्च कमी व्हावा, तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर करावा म्हणून कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन-तीन वर्षांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या खरिपासाठी सोयाबीनचे ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणे आवश्यक आहे. सध्या शेतकऱ्यांकडे २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल पेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असल्याने शेतकरीच बियाणे बँक ठरत आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९९ हजार ९०० हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा होतो. जवळपास ४ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यापाठोपाठ तुरीचा ९० हजार हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांची मदार ही विविध बियाणे कंपन्यांवर होती. मात्र, तीन- चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कंपनीचे बियाणेही उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. परिणामी, कृषी विभागाने घरगुती बियाणांच्या वापराकडे लक्ष केंद्रित केले.

सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर वाढावा. तसेच शेतकऱ्यांची बियाण्यांसाठीच्या होणाऱ्या खर्चात काही प्रमाणात बचत व्हावी म्हणून गेल्या दोन- तीन वर्षांपासून कृषी विभागाने गावोगावी- शेती बांधावर जाऊन बीज प्रक्रिया करून घरगुती बियाणांचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर वाढला आहे.

२ लाख ३८ हजार क्विंटल घरगुती बियाणे...जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार हेक्टरवर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. दरम्यान, काही शेतकरी बियाणे बदल करतात म्हणून कृषी विभागाने शासनाकडे विविध कंपन्यांच्या १ लाख २८ हजार ६२५ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. उर्वरित २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणे हे घरगुती वापरले जाणार आहे.

तुरीचा पेरा ९० हजार हेक्टरवर...सोयाबीनपाठोपाठ तुरीचे उत्पादन घेतले जाते. यंदा ९० हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. ज्वारी २० हजार हेक्टर, मूग १० हजार हेक्टर, उडीद पिकाचा ८ हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदपूर आणि जळकोट तालुक्यात काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी १३ हजार पॉकेट कापूस बियाणे उपलब्ध झाले आहे.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये...यंदाच्या खरिपात कुठल्याही बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. घरगुती बियाणांचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे आर्थिक फायदाही होईल.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर