शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

By admin | Updated: January 7, 2017 18:43 IST

रक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे, असा आरोप डॉ़. बाबा आढाव यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ -  आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत. या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे. हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़. बाबा आढाव यांनी येथे शनिवारी विचारला.
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगल यांची उपस्थिती होती़. प्रास्ताविक शिवाजी माडे यांनी केले.
प्रारंभी जातीच्या उतरंडीला अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाबा आढाव म्हणाले, जातीअंताबाबत पुरकबाबी पुरोगामी सांगतात़ आजच्या शिक्षणात जातीअंताच्या शिक्षणाची सोय नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. आता नवा विचार दाबता येणार नाही़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा प्रखड सवालही त्यांनी उपस्थित केला़. आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे. शेतक-यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़, शेतक-यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़. भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाºया घटना बदलाचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे, असेही बाबा आढाव म्हणाले. यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़.
 
शेतकयांबाबत सरकार गंभीर नाही़
महात्मा फुलेंच्या काळातही शेतकरी कर्जबाजारी होता़ मात्र त्याला जगण्यासाठी पर्याय होते़. त्यामुळे शेतक-यांनी त्या काळात आत्महत्या केल्या नाहीत़ शेतीसारख्या असलेल्या भांडवलातून तो जगत होता़. गुरा-ढोरांची गोठ्यात संख्याही मोठी होती़ बांधावर झाडेही होते़ त्यामुळे संकट काळात या भांडवलाचा शेतक-यांना आधार होता़. आता मात्र शेतात नापिकी आहे, गोठ्यात गुरे-ढोरे नाहीत आणि म्हणावे तसे भांडवलही नाही त्यामुळे समाजातील शेतकºयांची पत घसरली आहे़ यातूनच शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत़ शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी केला. शेतक-यांचे कर्जबळी व व्यवस्था परिवर्तन या विषयावर ते बोलत होते़