शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

By admin | Updated: January 7, 2017 18:43 IST

रक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे, असा आरोप डॉ़. बाबा आढाव यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ -  आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत. या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे. हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़. बाबा आढाव यांनी येथे शनिवारी विचारला.
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगल यांची उपस्थिती होती़. प्रास्ताविक शिवाजी माडे यांनी केले.
प्रारंभी जातीच्या उतरंडीला अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाबा आढाव म्हणाले, जातीअंताबाबत पुरकबाबी पुरोगामी सांगतात़ आजच्या शिक्षणात जातीअंताच्या शिक्षणाची सोय नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. आता नवा विचार दाबता येणार नाही़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा प्रखड सवालही त्यांनी उपस्थित केला़. आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे. शेतक-यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़, शेतक-यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़. भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाºया घटना बदलाचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे, असेही बाबा आढाव म्हणाले. यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़.
 
शेतकयांबाबत सरकार गंभीर नाही़
महात्मा फुलेंच्या काळातही शेतकरी कर्जबाजारी होता़ मात्र त्याला जगण्यासाठी पर्याय होते़. त्यामुळे शेतक-यांनी त्या काळात आत्महत्या केल्या नाहीत़ शेतीसारख्या असलेल्या भांडवलातून तो जगत होता़. गुरा-ढोरांची गोठ्यात संख्याही मोठी होती़ बांधावर झाडेही होते़ त्यामुळे संकट काळात या भांडवलाचा शेतक-यांना आधार होता़. आता मात्र शेतात नापिकी आहे, गोठ्यात गुरे-ढोरे नाहीत आणि म्हणावे तसे भांडवलही नाही त्यामुळे समाजातील शेतकºयांची पत घसरली आहे़ यातूनच शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत़ शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी केला. शेतक-यांचे कर्जबळी व व्यवस्था परिवर्तन या विषयावर ते बोलत होते़