शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

By admin | Updated: January 7, 2017 18:43 IST

रक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे, असा आरोप डॉ़. बाबा आढाव यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ -  आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत. या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे. हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़. बाबा आढाव यांनी येथे शनिवारी विचारला.
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगल यांची उपस्थिती होती़. प्रास्ताविक शिवाजी माडे यांनी केले.
प्रारंभी जातीच्या उतरंडीला अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाबा आढाव म्हणाले, जातीअंताबाबत पुरकबाबी पुरोगामी सांगतात़ आजच्या शिक्षणात जातीअंताच्या शिक्षणाची सोय नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. आता नवा विचार दाबता येणार नाही़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा प्रखड सवालही त्यांनी उपस्थित केला़. आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे. शेतक-यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़, शेतक-यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़. भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाºया घटना बदलाचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे, असेही बाबा आढाव म्हणाले. यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़.
 
शेतकयांबाबत सरकार गंभीर नाही़
महात्मा फुलेंच्या काळातही शेतकरी कर्जबाजारी होता़ मात्र त्याला जगण्यासाठी पर्याय होते़. त्यामुळे शेतक-यांनी त्या काळात आत्महत्या केल्या नाहीत़ शेतीसारख्या असलेल्या भांडवलातून तो जगत होता़. गुरा-ढोरांची गोठ्यात संख्याही मोठी होती़ बांधावर झाडेही होते़ त्यामुळे संकट काळात या भांडवलाचा शेतक-यांना आधार होता़. आता मात्र शेतात नापिकी आहे, गोठ्यात गुरे-ढोरे नाहीत आणि म्हणावे तसे भांडवलही नाही त्यामुळे समाजातील शेतकºयांची पत घसरली आहे़ यातूनच शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत़ शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी केला. शेतक-यांचे कर्जबळी व व्यवस्था परिवर्तन या विषयावर ते बोलत होते़