शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, डोळ्यामागील विचारदृष्टी नव्हे:  नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 3:19 PM

समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे.

- धर्मराज हल्लाळे/दुर्गेश सोनार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते. डोळ्यामागे दडलेली विचारदृष्टी नष्ट करू शकत नाही. ही दृष्टी देण्याचे काम साहित्य करते. त्यात वैचारिक मतभेद असू शकतील, पण मनभेद नको, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले. 

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी गडकरी म्हणाले, समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे. साहित्यिकांनी कोणत्या विषयावर लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, लेखन उद्दिष्ट काय याचाही विचार व्हावा. साहित्य जर राष्ट्रानुकूल, युगानुकूल असेल तरच देश जगाला मार्गदर्शन करू शकेल. 

‘समता व शौर्य ही महाराष्ट्राची ओळख’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.  राष्ट्रपतींनी संदेशाची सुरुवात मराठीतून केली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरेचा दाखल देत त्यांनी संत तुकारामांचा अभंगही सादर केला.

राजकारणावर बोलू नये...शिक्षण, साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारणावर बोलू नये. राजकारणी साहित्य जाणणारा असेल तर त्याचे प्रतिबिंब धोरणात उमटते, हे सांगताना गडकरी यांनी सुधाकरराव नाईक, श्रीकांत जिचकार यांचा उल्लेख केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६२ गावांतील जनतेच्या कुचंबणेचा मुद्दा पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री बनसोडे यांनी मांडला. नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले तेव्हा, सीमा प्रश्नावर घोषणाबाजी झाली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlaturलातूरliteratureसाहित्य